शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरच टाकल्या केबल

By admin | Updated: April 10, 2015 05:36 IST

सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे

बारामती : सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे; परंतु कामाचा दर्जा, त्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याने वीज महावितरणच्या ठेकेदाराने बारामती नगरपालिकेला ‘चुना’ लावला असल्याचे चित्र आहे. बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर येऊन पडते. नगरपालिकेत यावर विचारणा केल्यानंतर ८ दिवसांत कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बारामती नगरपालिकेची जुनी हद्द आणि नवीन वाढीव हद्दीत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. वीजवाहिन्या जमिनीत गाडण्यासाठी खोल चाऱ्या घेण्याची तसदीदेखील ठेकेदाराने पार पाडली नाही. त्याचबरोबर सिमेंटच्या फुटक्या पाईपचा वापर वीजवाहिन्यांवर आच्छादन करण्यासाठी केला आहे. या सिमेंटचे पाईप कामगारांनी उचलतानाच फुटलेले आहेत. या कामाच्या दर्जाकडे कोणाचेच लक्ष नाही. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम वेगळे, पथदिव्यांसाठी खांब उभे करण्यासाठी वेगवेगळे ठेके देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच कामावर दोन वेळा खोदाई करावी लागते. या परिस्थितीत मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ झाल्या. त्याचा घोटाळा काढताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आले. एका ठिकाणचा घोटाळा काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तोच प्रकार घडत होता. पावसाळ्यात हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकत असताना अरुंद रस्ते, गल्लीबोळांमध्ये मनमानी पद्धतीने काम करण्यात आले आहे. केबल उघड्यावर आहेत. या केबलचा दर्जादेखील तपासण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविरोधात नगरसेवक सुभाष ढोले यांनी विचारणा केली. त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरातील कामाचा दर्जा तपासून अहवाल ८ दिवसांत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालाची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीला वीजवाहिन्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांसाठी खड्डे खोदून सिमेंटच्या चौथाऱ्यावर खांब उभे करण्याचे काम आहे. ठेकेदाराने त्यामध्येदेखील ‘ठकगिरी’ केली आहे. त्यामुळे आताच खांब वेडेवाकडे होण्याचे प्रकार घडत आहेत. एकूणच, संपूर्ण कामांची चौकशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)