शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Exclusive News| टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 06:00 IST

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिक व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात....

राहुल शिंदे

पुणे: लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणा-या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council Of Examination) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिक व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात. त्यामुळे राज्य शासनाचे परीक्षा परिषदेकडे झालेले अक्षम्य दूर्लक्ष आणि परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली असली तरी सुमारे चार-पाच वर्षांपासून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) , अनेक  शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह विविध परीक्षा घेतल्या जातात. राज्यातील विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून परिषदेकडे गोडाऊनसाठी स्वतंत्र व मोठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे परिषदेने पत्र्याचे गोडाऊन तयार केले आहे. त्यात पेट्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ठेवल्या जातात.परिणामी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य परिषदेने पत्र्याच्या गोडाऊनमध्ये बंद करून ठेवणे योग्य आहे का ? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

परीक्षा परिषदेने विविध परीक्षा घेऊन स्वत:च्या आर्थिक उत्पन्नात वाढ केली. त्यामुळे सुमारे 2016 मध्ये परिषदेकडे सर्व सुविधा असणारी सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही निधीची अपेक्षा न करता परीक्षा परिषदेने स्वत:कडील निधी तरतुद इमारतीसाठी केली. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरी घेण्यात आली. त्यामुळे परिषदेने भक्कम गोडाऊन न बांधता पत्र्याचे गोडाऊन बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली नाही.  

परिषदेच्या बाहेर पत्र्याच्या पेट्यांचा ढीग-परिषदेकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्य कार्यालायाच्या समोरील मोकळ्या जागेत पत्र्याच्या पेट्या ठेवल्या जातात. त्यानंतर जवळच असलेल्या गोडाऊनमध्ये त्या ठेवल्या जातात. बदल्या हवामानामुळे या पेट्या पाण्यात भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पेट्या सुरक्षित ठेवणे योग्य आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र