शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Maharashtra: सलग चौथ्या वर्षी राज्यात जादा पाऊस, यंदा सरासरीच्या २३ टक्के अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:21 IST

राज्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात झाला आहे...

पुणे : राज्यात सलग चौथ्या वर्षी अतिरिक्त पाऊस पडला आहे. यंदाही सरासरीपेक्षा २३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यंदा जूनमधील अतिरिक्त पावसाने राहिलेली उर्वरित तीन महिन्यांतील तूट भरून काढली असून, पावसाळ्याच्या चार महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा अतिरिक्त बरसला आहे. राज्याची सरासरी ९९४.५ असताना, ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात १२१९.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे.

सर्वाधिक नाशिक, सर्वात कमी सांगली

राज्याचा विचार करता, विदर्भात सर्वाधिक ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २६ टक्के, मराठवाड्यात २४ टक्के, तर कोकणात ९ टक्के, तर जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात ४६ टक्के जादा झाला आहे; तर हिंगोलीत सरासरीच्या ११ टक्के कमी झाला आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात ३३ टक्के जादा पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे.

सप्टेंबरमध्ये ५० टक्के जादा

राज्यातील सर्व उपविभागांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या महिन्यात सरासरीच्या तुलनेत ३० ते ४५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. १ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला असून, ही सरासरी १७२.५ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात २५९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

२०१९ नंतर राज्यात सलग चौथ्यावर्षी मान्सून अधिकचा बरसला आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी मान्सून पाऊस ९९४.२ मिलिमीटर असतो. २०२१ पर्यंत गेल्या तीन वर्षांत राज्यात पावसाळ्यात ११७६ ते १३६० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदादेखील हा पाऊस १२१९.७ मिलिमीटर झाला आहे.

स्थिती पावसाला अनुकूल

हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम काश्यपी म्हणाले, "जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनेकवेळा बंगालच्या उपसागरावर सतत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे मध्य भारतातील काही भाग तसेच महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला. यामुळे तयार झालेल्या प्रणालींची दिशा पश्चिमेकडे किंवा पश्चिम-वायव्य अशी होती. परिणामी मान्सूनचा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे सरकण्यास मदत झाली.”

पुढील तीन दिवस पाऊस

हवामान विभागाने राज्यभरात येत्या तीन दिवसांत पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, विशेषतः कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र