शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणार; मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा परिणाम

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2024 17:09 IST

सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते

पुणे : केंद्र सरकारने सी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात ६.८७ रुपये प्रति लिटर अशी घसघशीत वाढ केल्याने तसेच मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणे अपेक्षित आहे, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. परिणामी इथेनॉल बंदीमुळे मध्यंतरीच्या काळात झालेल्या नकारात्मक निर्णयामुळे देशातील इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे प्रमाण १०.५० टक्क्यापर्यंत घसरले होते, ते या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान १२ ते १५ टक्क्यापर्यंत जाईल, असेही महासंघाचे मत आहे.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, “मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा सकारात्मक परिणाम कारखानदारीवर होऊन इथेनॉल निर्मिती वाढू शकते. त्यापूर्वी केंद्र सरकारने सिरप व ज्यूसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर निर्बंध आणले होते. मुळात हा निर्णय हंगामापूर्वी घेणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने त्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात दुरुस्त केला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. साखर उपलब्धतेत घट होईल अशी केंद्र सरकारला भीती होती. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देशभरात झालेल्या पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते.”

३०५ लाख टनांचा अंदाज

देशात १५ जानेवारीपर्यंत ५०९ साखर कारखान्यांत १ हजार ५६३ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आजपर्यंत आघाडी राखली आहे. या गाळप हंगामाअखेर देशात किमान ३०५.५० लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यात आणखी ८ ते १० लाख टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक हे तीन राज्ये देशात आघाडीवर असून त्यात त्यांचे योगदान ७५.८३ टक्के आहे. महाराष्ट्रातील १९७ कारखान्यात ५४८.३९ लाख टन ऊसगाळप झाले असून त्यातून ५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांतून ४६५.६६ लाख टन उसाचे गाळप होऊन ४६.१० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कर्नाटकातील ६९ कारखान्यांतून ३२२.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या तीनही राज्यात ऊस पिकाला परतीच्या पावसामुळे मोठा फायदा झाल्याने साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

साखर उताऱ्यात महाराष्ट्र पाचवे

सरासरी साखर उताऱ्यात उत्तर प्रदेश देशात आघाडीवर असून तेथे ९.९० टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल तेलंगणाचा क्रमांक असून तेथे साखर उतारा ९.७५ टक्के असा आहे. कर्नाटकात साखर उताऱ्याचे प्रमाण ९.६० टक्के असे आहे तर मध्य प्रदेशात साखर उतारा ९.५० टक्के असा आहे. महाराष्ट्रात साखर उतारा ९.३० टक्के असून वाढत्या थंडीने याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुजरात, बिहार, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये साखर उताऱ्याचे प्रमाण प्रत्येकी सरासरी ९.२० टक्के असे आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसGovernmentसरकारMONEYपैसा