शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन स्थगित तरीही उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून ...

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून लोक संमेलनस्थळी येतात. सद्यस्थितीत नाशिककरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हे हिताचे नव्हे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा निर्णय योग्य आहे. संमेलनाला स्थगिती दिली तरी साहित्य रसिकांचा उत्साह कायम राहील, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’त्यांच्याशी संवाद साधला.

जोशी म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्याच्या अखेरीस होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने स्थगित केले आहे. असा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि नाशिकच्या आयोजक संस्थेने घेतला. साहित्य संमेलन मराठी समाजाचा वाङमयीन उत्सव आहे. या उत्सवाचे जगभरातील मराठी माणसांना खूप आकर्षण असते. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाली. त्याने साहित्यरसिकांचा उत्साह वाढवला होता. कोरोना महामारीच्या जागतिक संकटात डॉ. नारळीकरांसारखे संशोधक आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला कोणती दिशा दाखवतात. या विषयीची जिज्ञासा सर्वसामान्य मराठी साहित्य रसिक आणि वाचकांच्या मनात होती. पण आता त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.

नाशिक संमेलनस्थळ ठरवताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाची पूर्वपरवानगी घेऊनच संमेलनाचे नियोजन करावे. अशी सूचना साहित्य महामंडळातील अनेक सदस्यांनी केली होती. स्थळ ठरल्यानंतर कोरोना कमी होत असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या. त्यामुळे संमेलनाची आशा वाढली होती. सद्यस्थितीत पाहता ते स्थगित करावे लागले. सहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन हे रसिकांचे मुख्य आकर्षण असते. पुस्तके पाहण्यासाठी झालेली दर्दीची गर्दी, तो उत्साह आवरणे सद्यस्थितीत कठीण झाले असते. साहित्य संमेलन स्थगित झाले तरी रसिकांचा उत्साह कमी झालेला नाही. कारण भीतीच्या सावटाखाली साहित्याचा आनंद घेणे. त्यांनाही सोयीस्कर वाटले नसते. त्यामुळे हे साहित्य रसिक वातावरण निवळण्याची निश्चितच वाट पाहतील.