शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:07 IST

पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची उडाली धांदल

ठळक मुद्देपावसाळापूर्व कामाचे दाखले देण्यावर अधिकाऱ्यांचा भर

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची त्रेधा उडाली असून अद्यापही आपत्ती व्यवस्थापन कक्ष ढेपाळलेलाच असल्याचे दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. तर, अधिकारीही फोन घेत नसल्याचे सांगण्यात आले.गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला होता. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोंढवा-हडपसर, वानवडी, येरवडा, वडगाव शेरी आदी भागात पूर आला होता. सर्वाधिक नुकसान आंबील ओढा आणि त्यालगतच्या परिसराचे झाले होते. या पुरात २८ पेक्षा अधिक बळी गेले होते. यासोबतच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नाल्याबाहेर असलेल्या रस्त्यांवरून तसेच सोसायटयांमध्ये जवळपास १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी होते. अनेकांचे वाहून गेलेले संसार अद्यापही सावरलेले नाहीत. शेकडो सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या आहेत. त्या आद्यपही तशाच पडून आहेत. एकंदरीतच पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणारे काम होऊ न शकल्याने नागरिक धास्तावलेले आहेत.त्यातच, पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा केवळ नावापुरताच आहे की काय अशी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता हा कक्ष असला तरी कक्षातील फोन मात्र उचलला जात नाही. या विभागाचे अधिकारीही फोन घेत नसल्याने नागरिकांना माहिती द्यायची असल्यास अग्निशामक दल किंवा पोलिसांना फोन करावा लागतो. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाकडील १५ पथके तैनात करण्यात आल्याचे आणि त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संजय गावडे यांनी सांगितले. व्हेईकल डेपो आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून मुख्य खात्याकडून तसेच आयुक्त स्तरावरून सर्वांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आपत्ती व्यवस्थापन विभाग क्षेत्रीय कार्यालयांवर जबाबदारी टाकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे.आपत्ती व्यवस्थापनची किती पथके आहेत, त्याचे नियंत्रण कोण करते आहे, पावसाळ्यात गेल्या वर्षीप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नेमका काय 'प्लॅन' आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.------------------आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे याची माहिती दिली जाणार आहे. कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाईन आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्यात येणारी असून स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला एकत्रित नियंत्रण कक्ष केला जाईल. यासोबतच मलवाहिन्या, नाले आणि चेंबर्सची स्वच्छता झाली आहे. जवळपास १६ हजार चेंबर्स स्वच्छ करण्यात आले आहेत. कात्रज तलावातील गाळ काढून खोलीकरण आणि बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात आली आहे. आंबील ओढ्याच्या स्वच्छतेसह पावसाळापूर्व कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका-------------सगळा भार पुन्हा अग्निशामक दलावरवडगाव शेरी, येरवड, शांतीनगर, हडपसर साडे सतरानळी आदी आठ ते नऊ ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. यासोबतच संध्याकाळी पाच पर्यंत शहराच्या विविध भागात झाडपडीच्या ६० पेक्षा अधिक घटना घडल्या. या सर्व कॉल्सवर अग्निशामक दलाचे जवान गेले होते. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उचलला जात नसल्याने सर्व भार अग्निशामक दलाच्या जवानांवरच आला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसfire brigade puneपुणे अग्निशामक दलcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम