शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:48 IST

खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी ‘हत्ती’च्या तोंडात जशाला तसेच राहते!‘ऐने अकबरी’त मनोरंजक गोष्टी

श्रीकिशन काळे

पुणे : हत्ती हा धिप्पाड आहे. तो अतिशय संवेदनशील आहे. माणसाला ज्या भावना असतात, त्याच त्यालाही असतात. माणसासारखे तो १२० वर्षांपर्यंत जगू शकतो; परंतु हे आयुष्यमान हत्तीला अकबर बादशाहच्या काळात होते. आता हत्तीचे वय साधारण ८० च्या जवळपास आहे. २०१७ मध्ये भारतात २७ हजार हत्ती होते. हस्तिदंतासाठी त्यांची हत्या केली जाते. आता ही संख्या अजून कमी झाली असेल. पूर्वी भारतात लाखो हत्तींची संख्या होती. ती आता काही हजारांवर आली आहे.

चारशे वर्षांपूर्वी अकबर बादशहाकडे ५ हजार हत्तींची फौज होती. लढाईसाठी हत्तीचा वापर होत असे. अकबर बादशहाच्या दरबारातील अबुल फजल याने त्यावेळच्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी ‘ऐने अकबरी’मध्ये नोंद केल्या आहेत. सोळाव्या शतकातील हे वर्णन मनोरंजक तर आहेच; पण ते लिहिणाऱ्याला कसे आणि कुठून प्राप्त झाले, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

४१ व्या ऐनमध्ये अकबराचा चरित्रकार अबुल फजल लिहितो की, संगीताचे काही आलाप हत्ती असे काही लक्षात ठेवतो की, संगीताशी परिचित असलेल्या एखाद्या जाणकाराच्याच फक्त लक्षात राहू शकतात ! हत्तीला संगीताच्या सुरांची व तालांची चांगली जाण असते. तो पाय हलवून लयबध्द हालचाली करू शकतो. रणांगणावर असताना हत्ती धनुष्यातून बाण मारू शकतो, बंदूकही चालवू शकतो, जमिनीवर पडलेल्या वस्तू सोंडेने उचलून माहुताकडे देऊ शकतो. खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी तोंडाद्वारे बाहेर काढू शकतो आणि ते त्या गवतात कोणताही बदल झालेला नसतो. (गवतावर रासायनिक प्रक्रिया झालेली नसते).

आता भारतात किती हत्ती ?

भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे जाहीर एका अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात केवळ २७ हजार ३१२ हत्ती होते. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यात लक्षणीय घट झाली. २०१२ मध्ये ही संख्या ३१,७११ होती.

''हत्ती हा वैभवाचे, संपन्नतेचे लक्षण मानतो. पूर्वी लढाई करण्यासाठी हत्तीचा वापर होत असे. आपल्याकडे आता हत्ती कमीच आहे. हत्ती पोसणे कमी नाही. अकबर बादशाहच्या दरबारातील अबुल फजलने ‘ऐने अकबरी’ हा पारसीमध्ये ग्रंथ लिहिलेला. तो नंतर इंग्रजीत आला आणि मराठीत मी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ नावाने प्रसिध्द केला. त्यात तेव्हाच्या हत्तीविषयीच्या अनेक मनोरंजक गोष्टी नमूद आहेत. - महेश तेंडुलकर, इतिहास संशोधक व इतिहासातील प्राणिविश्व पुस्तकाचे लेखक''

''हत्तीच्या तोंडात एका बाजुला गवत किंवा पाणी साठवून ठेवता येते. पोटात गेल्यानंतर अनेकदा गवत विष्ठेतून जशाला तसे बाहेर येते. त्यावर रासायनिक प्रक्रिया होत नाही. आता सोंडेतून पाणी बाहेर काढताना पाहता येते. - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशूवैद्यकीय अधिकारी'' 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकIndiaभारतforestजंगलenvironmentपर्यावरण