शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:48 IST

खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी ‘हत्ती’च्या तोंडात जशाला तसेच राहते!‘ऐने अकबरी’त मनोरंजक गोष्टी

श्रीकिशन काळे

पुणे : हत्ती हा धिप्पाड आहे. तो अतिशय संवेदनशील आहे. माणसाला ज्या भावना असतात, त्याच त्यालाही असतात. माणसासारखे तो १२० वर्षांपर्यंत जगू शकतो; परंतु हे आयुष्यमान हत्तीला अकबर बादशाहच्या काळात होते. आता हत्तीचे वय साधारण ८० च्या जवळपास आहे. २०१७ मध्ये भारतात २७ हजार हत्ती होते. हस्तिदंतासाठी त्यांची हत्या केली जाते. आता ही संख्या अजून कमी झाली असेल. पूर्वी भारतात लाखो हत्तींची संख्या होती. ती आता काही हजारांवर आली आहे.

चारशे वर्षांपूर्वी अकबर बादशहाकडे ५ हजार हत्तींची फौज होती. लढाईसाठी हत्तीचा वापर होत असे. अकबर बादशहाच्या दरबारातील अबुल फजल याने त्यावेळच्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी ‘ऐने अकबरी’मध्ये नोंद केल्या आहेत. सोळाव्या शतकातील हे वर्णन मनोरंजक तर आहेच; पण ते लिहिणाऱ्याला कसे आणि कुठून प्राप्त झाले, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

४१ व्या ऐनमध्ये अकबराचा चरित्रकार अबुल फजल लिहितो की, संगीताचे काही आलाप हत्ती असे काही लक्षात ठेवतो की, संगीताशी परिचित असलेल्या एखाद्या जाणकाराच्याच फक्त लक्षात राहू शकतात ! हत्तीला संगीताच्या सुरांची व तालांची चांगली जाण असते. तो पाय हलवून लयबध्द हालचाली करू शकतो. रणांगणावर असताना हत्ती धनुष्यातून बाण मारू शकतो, बंदूकही चालवू शकतो, जमिनीवर पडलेल्या वस्तू सोंडेने उचलून माहुताकडे देऊ शकतो. खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी तोंडाद्वारे बाहेर काढू शकतो आणि ते त्या गवतात कोणताही बदल झालेला नसतो. (गवतावर रासायनिक प्रक्रिया झालेली नसते).

आता भारतात किती हत्ती ?

भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे जाहीर एका अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात केवळ २७ हजार ३१२ हत्ती होते. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यात लक्षणीय घट झाली. २०१२ मध्ये ही संख्या ३१,७११ होती.

''हत्ती हा वैभवाचे, संपन्नतेचे लक्षण मानतो. पूर्वी लढाई करण्यासाठी हत्तीचा वापर होत असे. आपल्याकडे आता हत्ती कमीच आहे. हत्ती पोसणे कमी नाही. अकबर बादशाहच्या दरबारातील अबुल फजलने ‘ऐने अकबरी’ हा पारसीमध्ये ग्रंथ लिहिलेला. तो नंतर इंग्रजीत आला आणि मराठीत मी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ नावाने प्रसिध्द केला. त्यात तेव्हाच्या हत्तीविषयीच्या अनेक मनोरंजक गोष्टी नमूद आहेत. - महेश तेंडुलकर, इतिहास संशोधक व इतिहासातील प्राणिविश्व पुस्तकाचे लेखक''

''हत्तीच्या तोंडात एका बाजुला गवत किंवा पाणी साठवून ठेवता येते. पोटात गेल्यानंतर अनेकदा गवत विष्ठेतून जशाला तसे बाहेर येते. त्यावर रासायनिक प्रक्रिया होत नाही. आता सोंडेतून पाणी बाहेर काढताना पाहता येते. - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशूवैद्यकीय अधिकारी'' 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकIndiaभारतforestजंगलenvironmentपर्यावरण