शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:53 IST

भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे..

 पुणे : आगामी २०१९ ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. परंतु, काहीजणांना ही निवडणुक आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी तर काहींना स्वत:च्या मुलांना राजकीय क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाची वाटते आहे. भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, मागच्या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झाला होता. कोणत्याही क्षेत्रातले निर्णयच घेतले जात नव्हते. मोदी मात्र एकही क्षण वाया न घालवता काम करत आहेत. २१ व्या शतकात भारताला व्कासपथावर नेण्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. परंतु, त्यानंतरच्या दहा वर्षात काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली. गेल्या पंचावन्न महिन्यांत आता मोदी यांनी पुन्हा विकासाला वेग दिला आहे. येत्या काही वर्षातच भारत अमेरिका, चीन यांना मागे टाकील अशी स्थिती आहे. ती टिकवायची असेल तर मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी शिवाजी महाराज - अफझल खान युद्धाचा दाखला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, महाराजांनी सर्व युध्द प्रसंगात शांततेने व्यूहरचना केली. आपले चौकी पहारे जागते ठेवले. खानाचे आत आलेले सगळेच्या सगळे सैन्य त्यांनी कापून काढले. मोठा विजय मिळवला. तो आजही ऐतिहासिक समजला जातो. आताची लढाईही तशीच आहे. ती तलवारीने लढायची नाही, पण मतदानाने लढायची आहे. बूथ म्हणजे चौकी, पहारे. तिथे असणारे कार्यकर्ते म्हणजे मावळे. आज काही अफजलखान नाही, मात्र त्याची प्रवृत्ती असणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बूथ भक्कम ठेवा. ती खरी गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे