शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

संपूर्ण महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाची परिणामकारकता आज रात्री १२ पर्यंतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:22 IST

हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचे मत

ठळक मुद्दे सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला आहे. पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. काल दिवसभरात अनेक झाडपडी, घरांचे नुकसान, विजेच्या संदर्भातील घटना घडल्या आहेत. 

"तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील शहरांना बराच धोका निर्माण झाला होता. आता हे गुजरातकडे सरकू लागले आहे. त्यामुळे आज रात्री बारा, एक पर्यंतच महाराष्ट्रातचक्रीवादळाचा परिणाम जाणवेल" असे हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

काल सकाळपासूनच कोकण किनारपट्टीबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात हवामानात बदल झाला होता. काही ठिकाणी वादळी वारे सुटले होते. तर काही भागात पाऊस सुरू झाला होता. पण आता दुपारनंतर उर्वरित राज्यात त्याचा परिणाम कमी जाणवू लागला आहे. सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत झाले असेल. असेही ते म्हणाले आहेत. साबळे म्हणाले, सद्यस्थितीत वादळाची परिणामकारकता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी जास्त आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील भागात २०० ते ३०० मिलीमीटर पावसाचे प्रमाण वाढते. तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस पडतो. आता कालपासून आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर ते गुजरातकडे सरकू लागल्याने त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला होता. रात्रीपर्यंत तोही पूर्णपणे बंद होईल. 

पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता 

चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी भागातील आंबा, काजू, सुपारी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वादळी वारे अथवा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारRainपाऊसcycloneचक्रीवादळ