शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

संपूर्ण महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाची परिणामकारकता आज रात्री १२ पर्यंतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:22 IST

हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचे मत

ठळक मुद्दे सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला आहे. पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. काल दिवसभरात अनेक झाडपडी, घरांचे नुकसान, विजेच्या संदर्भातील घटना घडल्या आहेत. 

"तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील शहरांना बराच धोका निर्माण झाला होता. आता हे गुजरातकडे सरकू लागले आहे. त्यामुळे आज रात्री बारा, एक पर्यंतच महाराष्ट्रातचक्रीवादळाचा परिणाम जाणवेल" असे हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

काल सकाळपासूनच कोकण किनारपट्टीबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात हवामानात बदल झाला होता. काही ठिकाणी वादळी वारे सुटले होते. तर काही भागात पाऊस सुरू झाला होता. पण आता दुपारनंतर उर्वरित राज्यात त्याचा परिणाम कमी जाणवू लागला आहे. सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत झाले असेल. असेही ते म्हणाले आहेत. साबळे म्हणाले, सद्यस्थितीत वादळाची परिणामकारकता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी जास्त आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील भागात २०० ते ३०० मिलीमीटर पावसाचे प्रमाण वाढते. तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस पडतो. आता कालपासून आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर ते गुजरातकडे सरकू लागल्याने त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला होता. रात्रीपर्यंत तोही पूर्णपणे बंद होईल. 

पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता 

चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी भागातील आंबा, काजू, सुपारी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वादळी वारे अथवा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारRainपाऊसcycloneचक्रीवादळ