शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

शिक्षण झेडपी शाळेत... डंका शासकीय सेवेत!

By admin | Updated: April 28, 2017 05:50 IST

शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय

बारामती : शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय स्पर्धा परीक्षांत दमदार कामगिरी करीत असल्याचे समोर आले आहे. शासकीय सेवेतही त्यांच्या कामगिरीचा डंका वाजू लागला आहे. गेल्या काही वर्षांत बारामती, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रिया ढाकणे, अ‍ॅड. स्वाती जाधव, डॉ. सागर जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, आयएफएस आदी महत्त्वाच्या पदांवर झेप घेतली आहे. अहमदनगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आनंद भोईटे यांचे प्राथमिक शिक्षण सणसर (ता. इंदापूर) येथे झाले आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, की, आमचा सणसरच्या जिल्हा परिषद शाळेतच शैक्षणिक पाया पक्का झाला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम मराठीतून आहे. इंग्रजी शिक्षण पुढे मिळतच असते. त्याचादेखील टप्प्याने विकास होतो. मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मसात करणे सोपे जाते. ढेकळवाडी (ता. बारामती) येथील डॉ. तुषार बोरकर सध्या जळगाव जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. डॉ. बोरकर यांनी सांगितले की, माझं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास अभ्यास समजून घेणे सोपे जाते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा पालकांच्या हट्टापायी विद्यार्थ्यांना त्यांचा कल न पाहता इंग्रजी शाळेत घातले जाते. इंग्रजी माध्यमदेखील चांगले आहे. ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मात्र, घरातील वातावरण इंग्रजी शिक्षणासाठी अनुकूल असणे तितकेच महत्त्वाचे ठरते.मुळच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील प्रिया ढाकणे यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. ढाकणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळेत सर्व थरातील मुले येतात. त्यातून येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वविकास होतो. माझा हा व्यक्तिमत्त्वविकासाचा अनुभव मला आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये उपयुक्त ठरला. हा विकास विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी उपयुक्त ठरतो. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जलदगतीने होतो. ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढत आहे.