शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आधी दुष्काळ, आता हवामानाची अवकृपा, पावसामुळे हाती आलेली पिके जाणार वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 01:18 IST

ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

बारामती  - ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, फळबागांच्या उत्पादनखर्चामध्ये वाढ होणार आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने बारामती-इंदापूर तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. बारामती-इंदापूरचा शासनाने दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. एकीकडे पाणीटंचाईचा सामना करीत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, माळेगाव, सोमेश्वरनगर, काटेवाडी, ढेकळवाडी, पिंपळी, डोर्लेवाडी, सांगवी आणि परिसरात, तर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, बोरी, काझड, शेळगाव, अंथुर्णे, कळस, वालचंदनगर, निमगाव केतकी परिसरात शेतकरी फळबागा सांभाळत आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दुपारी प्रचंड उकाडा, तर सायंकाळी व रात्रीच्या सुमारास पावसाचा शिडकावा त्यामुळे रोग बळावू लागले आहेत. फुलोºयात असलेल्या द्राक्ष घडांमध्ये व डाळिंबाच्या कळीमध्ये पावसाचे पाणी साठून राहते. परिणामी द्राक्षावर डाऊनी, घड कुज, करपा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, तर डाळिंबावर तेल्या, डांबºया, फळ कुज आदी रोग दिसून येऊ लागले आहेत. मागील तीन महिन्यांपासून दोन्ही तालुक्यांमध्ये हुमनीने ऊसशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. एकट्या इंदापूर तालुक्यात तब्बल १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र हुमनीमुळे बाधित झाले. काही भागात एकरी उसाचे उत्पादन ७० ते ७५ टक्क्यांनी घटले आहे. त्यात अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे फळबागांचे नुकसान होत असल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी संकटांनी घेरला गेला आहे.जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी अनेक तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरीप हंगाम कसाबसा हातात आला. मात्र, रब्बी हंगाम बहुतांश वाया गेला आहे. काही ठिकाणी पिके हाती येणार, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र, अवकाळीच्या फेºयामुळे ही पिकेही हातातून निघून घेली आहे. सर्वाधिक फटका भातउत्पादकांना बसला आहे.द्राक्ष, डाळींब, केळी आदीसारख्या फळबागांमध्ये शेतकरी मोठ्याप्रमाणात भांडवल गुंतवत असतो. नियोजनाप्रमाणे हंगाम साधला, तर शेतकºयाला उत्पन्नाची खात्री येते.मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती, रोगांचा वाढता प्रादुर्भाव व आता ढगाळ हवामान यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पीक हातचे सोडून द्यावे लागते, तर काही वेळेस बागाच काढून टाकाव्या लागतात. रोग आटोक्यात आणण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे.चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. डाऊन्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे औषधांच्या जादा फवारण्या कराव्या लागल्या. परिणामी, उत्पादन खर्चातदेखील वाढ झाली आहे. सध्या डाऊन्या आटोक्यात आला आहे.- सतीश भोसलेद्राक्ष उत्पादक शेतकरीलासुर्णे (ता. इंदापूर)फळबागा पट्ट्यात औषधकंपन्यांनी बाजार मांडला आहे. ‘अमूक एका कंपनीच्या औषधाने फरक पडत नाही. आमच्या कंपनीचे औषध मारा’ अशापद्धतीने कंपनीचे सेल्समन शेतकºयांच्या बांधावर जाऊन महागडी औषधे शेतकºयांच्या माथी मारत आहेत. या कंपन्या शासनाने बंदी घातलेली कीटकनाशके, बुरशीनाशके या माध्यमातून विकत तर नाहीत ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.भातपीक भिजल्याने उत्पादन घटले; पंचनाम्याची मागणीभोर : तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकºयांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरू असलेले भात पावसामुळे भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच रोगामुळे उत्पादनात घट, त्यात पुन्हा पावसाने पिके भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपासून भातकाढणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कामात व्यस्त आहेत. मात्र, शनिवारी ३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता अचानक मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबरला सायंकाळी, तर ६ नोव्हेंबरला रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतात कापून ठरवलेले भात खाचरात पाणी तुंबल्याने पाण्यात उपवत असून खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भात व पेंढा पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकºयांची मोठी तारांबळ उडाली.यावर्षी समाधानकारक पावसामुळे भाताचे पीक चांगले होते. मात्र, शेवटचे दोन पाऊस मिळाले नाहीत. यामुळे पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे भाताचे पीक घटले होते. राहिलेले भात दिवाळीच्या आधी काढावे म्हणून शेतकरी भातकापणी व झोडणीच्या घाईत होते. मात्र मागील ३ दिवसांपासून सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे आगार असलेले भोर तालुक्यातील पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे