शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अवकाळी पावसामुळे कांद्याला आला 'भाव' ; दाेन वर्षातील उच्चांकी दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 7:39 PM

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

पुणे : यंदा पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर पडलेला ओला दुष्काळाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून रविवार (दि.३) रोजी कांद्याला मागील दोन वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. रविवारी कांदा-बटाटा विभागात कांद्याला ५५० ते ५८० रुपये प्रतिदहा किलोस दर मिळाला. मार्केटयार्डात १३० ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याची ११० ट्रक तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली.

यंदा परतीचा पाऊस लांबला असून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. कर्नाटक राज्यातही पाऊस सुरु आहे. मात्र जुना आणि चांगला दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यास कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याता परिणाम कांद्याच्या दरात वाढ हाेण्यामध्ये झाला. चांगल्या प्रतिच्या नवीन कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. जुन्या कांद्याचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला़.

चार दिवसांपासूनच दर वाढण्यास सुरुवातगेल्या चार दिवसांमध्ये दररोजच कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली.  बुधवारी ४०० रुपये, गुरुवारी ४५० रुपये शुक्रवारी ४८० ते ५०० रुपये आणि रविवारी ५८० रुपये प्रतिदहा किलोस भाव होता. रविवारी मिळालेला भाव हा गेल्या दोन वषार्तील उच्चांकी भाव आहे.

किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलोघाऊक बाजारात कांदा ५५ ते ५८ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मात्र किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते वाढीव दराने विक्री करत असल्याचेही ग्राहकांनी सांगितले.

चांगल्या दर्जांच्या कांद्याचा तुटवडाबाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रतिचा कांदा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथून मागणी वाढली आहे़ परिणामी कांद्याच्या भावात वाढ होत आहे. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे भाववाढ झाली आहे.- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी 

टॅग्स :PuneपुणेonionकांदाRainपाऊस