शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 1:52 AM

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा

बारामती : बारामती तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामस्थ अवर्षणग्रस्त स्थितीमुळे हिवाळ्यातच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. या वर्षी बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मिमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील तहानलेल्या २६ हजार ३१२ ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील १४ गावे १०३ वाड्यावस्त्यांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी, सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, गाडीखेल,वढाणे या गावांसह १०३ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुुरु आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १० टँकरच्या ४८ खेपा सुरु आहेत. ६ शासकीय,४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.

तालुक्यातील १४ गावांमधील ७ हजार २४५ लोकसंख्येला तर १७ हजार १२६ लोकसंख्येचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांपासून बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्री छत्रपती कारखाना परिसरात ऊसशेती नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे सध्या तरी जगली आहे. मात्र, जिरायती भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागांत सुरु आहेत. त्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ या गावांना मे महिन्यापासून, मोराळवाडी गावाला जून महिन्यापासून टँकर सुरू आहे.पिण्याच्या पाण्यापाठोपाठ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न आहे. चारा, पाणीटंचाईने शेतकºयांच्या दारातील जनावरांची दावण रिकामी होत आहे. उसाच्या ५० मोळ्या ३५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. पाचट, वाढ्यासह हा उसाचा दर आहे.४प्रत्यक्षात ३५०० रुपयांमध्ये शेतकºयांना ७०० ते ८०० किलो ऊस मिळत आहे. ऊसविक्री करणाºया व्यावसायिकांनी ऊसविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. हे व्यावसायिक यवत, केडगाव, भांडगाव, नाझरे भागातून ऊस आणुन विक्री करण्यात येत आहे. कारखान्याच्या गाळपासाठी असलेला ऊस जनावरांच्या चाºयासाठी जात असल्याने गळीत हंगामावर त्याचा परीणाम होणार आहे.जनावरांसाठी मका पिकाची उपलब्धता नसल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मका पिकाऐवजी उसाचा खाद्यात समावेश झाल्याने हा परिणाम झाला आहे. माझ्याकडे तीन गायींचे प्रतिदिन ३२ लिटर दूध उत्पादन होते. तेच उत्पादन प्रतिदिन १० लीटरने घटले असल्याचे बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथील शेतकरी विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळBaramatiबारामतीPuneपुणे