शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

दुष्काळाच्या झळा : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईमुळे टँकरच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 14:19 IST

सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देशिरूरच्या पश्चिम पट्ट्यात पाण्यासाठी वणवण पाण्याचे स्रोत आटले, योजना बंद पडण्याच्या मार्गावर

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून शासनाने दिलेले टँकर कमी पडत आहेत.  यामुळे तालुक्यातील अनेक गावांत व वाड्यावस्त्यांवर टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.पाण्याचे स्रोत आटल्यामुळे यापूर्वी अनेक गावांनी पंचायत समितीकडे पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. त्या वेळी प्रशासनाने शिरूर तालुक्याच्या पश्निम भागात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले होते. आता दुष्काळाची परिस्थिती पाहता, प्रशासनाने टँकरच्या संख्येत वाढ केली आहे. परंतु तीदेखील अपूर्ण पडत आहे. सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पाण्याची समस्यादेखील मोठी असून, टँकरच्या होणाऱ्यां खेपांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

शासकीय टँकरबरोबरच खासगी टँकरने या भागाला दिलासा मिळत असला, तरी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ अनेक कुटंबांवर आली आहे. आठशे ते दीड हजार रुपये देऊन खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शासकीय टँकरची संख्या वाढवल्यास काही प्रमाणत या भागाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांचा पाण्यासाठी हात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अनेक संस्थांनी या भागाला मदतीचा हात देऊन टँकर दिले आहेत. पाबळ येथे पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी एक टँकर दिला आहे. तर, श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने एक टँकर देण्यात आला.......भीषण पाणीटंचाईत नोकरदार, व्यापारी व मध्यम वर्गीय लोकांची पाणी मिळवताना होणारी धावपळ पाहता, खासगी टँकरने दिलासा मिळत असल्याचे अनेक नागरिक सांगत असून खासगी टँकर मिळविण्यासाठीदेखील कसरत करावी लागत आहे. सुमारे ६० ते ७० छोटे-मोठे खासगी टँकर या भागात असून निदान विकत का होईना पाणी मिळते, यातच समाधान असल्याचे अनेक नागरिकांनी  सांगितले.......ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने परिसरातील विहिरीतून पायपीट करून महिलांना डोक्यावर पाणी आणण्याची वेळ आली आहे. आर्वी-तानाजीनगर येथे पाणीटंचाई

खेड शिवापूर : आर्वी-तानाजीनगर (ता. हवेली) येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस या परिसरात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.  ४येथील काही गावे आणि वस्त्यांवर जवळपास १२ ते १५ कूपनलिका आहेत. त्यापैकी काहींना थोडेसे पाणी आहे. कूपनलिकेतील पाण्याच्या साठ्यानुसार आणि क्रमानुसार रात्री-अपरात्री नागरिकांना पाणी भरावे लागत आहे. ४पाण्यासाठी भांड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. काही कूपनलिका पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तसेच आर्वी-तानाजीनगर येथे प्रत्येकी एक अशा नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरी असून त्याद्वारे गावात नळाद्वारे पाणी सोडण्यात येत असते. मात्र, या विहिरींनीही तळ गाठला असून या विहिरीत ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी विकत घेऊन सोडले जाते. परंतु या विहिरीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे सोडले जाते. इतर दिवशी विहिरीतून पाणी उपसून आणावे लागत आहे. .....येथील ग्रामस्थ नामदेव तुकाराम शिंदे यांच्या कूपनलिकेतील पाणी येथील सार्वजनिक नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडले आहे. यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनच्यावतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ४ एप्रिलला ठरावाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसून टँकर सुरू झालेले नाहीत. 

टॅग्स :Shirurशिरुरdroughtदुष्काळWaterपाणी