शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईमुळे टँकरच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 14:19 IST

सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देशिरूरच्या पश्चिम पट्ट्यात पाण्यासाठी वणवण पाण्याचे स्रोत आटले, योजना बंद पडण्याच्या मार्गावर

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून शासनाने दिलेले टँकर कमी पडत आहेत.  यामुळे तालुक्यातील अनेक गावांत व वाड्यावस्त्यांवर टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.पाण्याचे स्रोत आटल्यामुळे यापूर्वी अनेक गावांनी पंचायत समितीकडे पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. त्या वेळी प्रशासनाने शिरूर तालुक्याच्या पश्निम भागात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले होते. आता दुष्काळाची परिस्थिती पाहता, प्रशासनाने टँकरच्या संख्येत वाढ केली आहे. परंतु तीदेखील अपूर्ण पडत आहे. सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पाण्याची समस्यादेखील मोठी असून, टँकरच्या होणाऱ्यां खेपांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

शासकीय टँकरबरोबरच खासगी टँकरने या भागाला दिलासा मिळत असला, तरी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ अनेक कुटंबांवर आली आहे. आठशे ते दीड हजार रुपये देऊन खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शासकीय टँकरची संख्या वाढवल्यास काही प्रमाणत या भागाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांचा पाण्यासाठी हात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अनेक संस्थांनी या भागाला मदतीचा हात देऊन टँकर दिले आहेत. पाबळ येथे पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी एक टँकर दिला आहे. तर, श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने एक टँकर देण्यात आला.......भीषण पाणीटंचाईत नोकरदार, व्यापारी व मध्यम वर्गीय लोकांची पाणी मिळवताना होणारी धावपळ पाहता, खासगी टँकरने दिलासा मिळत असल्याचे अनेक नागरिक सांगत असून खासगी टँकर मिळविण्यासाठीदेखील कसरत करावी लागत आहे. सुमारे ६० ते ७० छोटे-मोठे खासगी टँकर या भागात असून निदान विकत का होईना पाणी मिळते, यातच समाधान असल्याचे अनेक नागरिकांनी  सांगितले.......ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने परिसरातील विहिरीतून पायपीट करून महिलांना डोक्यावर पाणी आणण्याची वेळ आली आहे. आर्वी-तानाजीनगर येथे पाणीटंचाई

खेड शिवापूर : आर्वी-तानाजीनगर (ता. हवेली) येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस या परिसरात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.  ४येथील काही गावे आणि वस्त्यांवर जवळपास १२ ते १५ कूपनलिका आहेत. त्यापैकी काहींना थोडेसे पाणी आहे. कूपनलिकेतील पाण्याच्या साठ्यानुसार आणि क्रमानुसार रात्री-अपरात्री नागरिकांना पाणी भरावे लागत आहे. ४पाण्यासाठी भांड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. काही कूपनलिका पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तसेच आर्वी-तानाजीनगर येथे प्रत्येकी एक अशा नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरी असून त्याद्वारे गावात नळाद्वारे पाणी सोडण्यात येत असते. मात्र, या विहिरींनीही तळ गाठला असून या विहिरीत ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी विकत घेऊन सोडले जाते. परंतु या विहिरीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे सोडले जाते. इतर दिवशी विहिरीतून पाणी उपसून आणावे लागत आहे. .....येथील ग्रामस्थ नामदेव तुकाराम शिंदे यांच्या कूपनलिकेतील पाणी येथील सार्वजनिक नळ-पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडले आहे. यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनच्यावतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ४ एप्रिलला ठरावाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसून टँकर सुरू झालेले नाहीत. 

टॅग्स :Shirurशिरुरdroughtदुष्काळWaterपाणी