शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:08 IST

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला

पुणे : राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवावी लागणार आहे. ही मदत देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींचा पाहणी दौरा मंगळवारपासून (दि. १२) शुक्रवारपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. याबाबत मंगळवारी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. केंद्र सरकारच्या चार तुकड्या हा पाहणी दौरा करणार आहेत. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर पुन्हा १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यात एकूण २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकांकडून पाहणी करण्यात येते. राज्य सरकारचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या पथकाकडूनही पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांमध्ये कृषी विभागाच्या प्रतिनिधींचा महत्त्वाचा सहभाग असून पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, जलजीवन मिशन, रोजगार हमी अग्रणी बँक, सीडब्ल्यूपीआरएस तसेच नागपूरच्या सुदूर संवेदन केंद्राच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. हे सर्व प्रतिनिधी मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा पुण्यात विभागीय आयुक्तालयात घेणार आहेत. त्यानंतर विभागनिहाय प्रतिनिधी पाहणी करता जाणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. पुणे विभागात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा दौरा करणार आहेत. पुण्यातील बारामती व पुरंदर या गंभीर, तर इंदापूर, दौंड व शिरूर या तालुक्यांचा समावेश असून, सोलापूरमधील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. चार दिवसांचा हा दौरा संपल्यानंतर शुक्रवारी ही सर्व पथके पुन्हा पुण्यात बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील. त्यानंतर केंद्र मदतीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळRainपाऊसenvironmentपर्यावरणFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार