शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: February 17, 2025 16:16 IST

भाऊ बाल्कनीतून खाली पडल्यावर आरोपी घरात बसून राहिला, या प्रकरणात कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

पुणे: घरगुती भांडणात अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला ढकलून दिल्यामुळे बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. मात्र, कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनेची चौकशी करत चुलत भावाला अटक केली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास धायरीत घडली होती.

अमर किसन देशमुख (३५, रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे मृताचे नाव आहे. राजू भुरेलाल देशमुख (रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे आरोपी चुलत भावाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहपत हरिराम साहारे (३६, रा. धायरीगाव) यांनी नांदेडसिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर आणि चुलत भाऊ राजू इतर दोघेही मूळ मध्य प्रदेशातील आहे. ते एका सोनपापडीच्या कारखान्यात काम करतात. राजू व अमर यांच्यामध्ये पत्नीबाबत बोलण्यावरून भांडण झाल्यामुळे अमर राजूच्या अंगावर धावला. त्यावेळी राजूने अमरला ढकलून दिल्याने तो बाल्कनीतून खाली पडला. त्याला कोणतीही मदत न करता राजू घरात बसून राहिला. हा सर्व प्रकार साहारेने पाहिला असतानाही तो तेथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरचा मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. तेव्हा राजूने घडलेला प्रकार सांगितला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल राजू देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश