शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

कुणी रेल्वे सुरू करता का रेल्वे? अधिकारी-कर्मचारी हतबल, मोठा आर्थिक भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 14:16 IST

कोरोना संकटामुळे जवळपास तीन महिन्यांपासून पुण्या-मुंबई दरम्यानची एसटी तसेच रेल्वे सेवा बंद..

ठळक मुद्देशासकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारकएका इंटरसिटी एक्सप्रेसने १३०० ते १५०० प्रवासी जातात पुण्यातून मुंबईलासरकारी व अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी

पुणे : मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्य कार्यालयांनीही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दररोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. बहुतेकांना  मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून त्यांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे किमान सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या धर्तीवर इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कोरोना संकटामुळे जवळपास तीन महिन्यांपासून पुण्या-मुंबईदरम्यानची एसटी तसेच रेल्वे सेवा बंद आहे. नोकरी तसेच व्यवसायानिमित्त दररोज पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पुण्यातून सकाळी मुंबईच्या दिशेने धावणारी डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस या गाड्या प्रवाशांनी भरून जातात. त्यामध्ये मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय यांसह विविध शासकीय कार्यालये, बँक, खासगी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच व्यावसायिक, वकील यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे सेवा ठप्प झाल्यानंतर पुणे-मुंबई प्रवास बंद झाला. संबंधितांना कामावर हजर न राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अडचणी येत नव्हत्या. पण आता अनलॉकमध्ये मंत्रालयासह मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक केले आहे.-----------------मुंबईला रोज जावे लागत असल्याने चार-पाच जणांना एकत्र येऊन खासगी वाहन करावे लागते. त्यासाठी ५ ते ६ हजार रुपये रोजचा खर्च येत आहे. खासगी वाहनाशिवाय दुसरा काहीच पर्याय नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. त्यामुळे किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करणे आवश्यक आहे.- अंकिता देशपांडे, कर्मचारी, मुंबई महापालिका-------------पुर्वी आठवड्यातून एकदाच कार्यालयात जावे लागत होते. पण आता दररोज जावे लागत असल्याने तीन-चार जणींमध्ये मिळून खासगी वाहनाने जावे लागत आहे. प्रत्येकी जवळपास दीड हजार खर्च येत आहे. दररोज मुंबईला येणारे अनेक जण आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे किंवा बसची व्यवस्था करणे गरजेचे आहे. रेल्वे सुरू झाली तर अनेकांची गैरसोय टळेल.- रोहिणी दणाणे, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई-----------------एका इंटरसिटी एक्सप्रेसने १३०० ते १५०० प्रवास पुण्यातून मुंबईला जातात. पुण्यातून सकाळी किमान तीन गाड्या मुंबईकडे जातात. या गाड्यांनी दररोज चार ते साडे चार हजार प्रवासी मुंबईला जातात. त्यामध्ये कल्याण, ठाणे, दादर, सीएसटीला जाणारे अनेक नोकरदार, व्यावसायिक आहेत. पण रेल्वेसेवा ठप्प असल्याने खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.--------------पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या रेल्वे -- डेक्कन क्वीन- प्रगती एक्सप्रेस- सिंहगड एक्सप्रेस- डेक्कन एक्सप्रेस- इंटरसिटी एक्सप्रेस- इंद्रायणी एक्सप्रेस----------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpassengerप्रवासी