शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 19:50 IST

लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव

पुणे : लोकसभा, त्यानंतर विधानसभेतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला, मात्र पक्षाच्या राज्य किंवा केंद्रीय शाखेनेही या पराभवाला जबाबदार कोण याची साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळेच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच जाहीरपणे रोष व्यक्त होऊ लागला आहे. राहुल प्रियंका सेना नावाच्या संघटनेने तर काँग्रेसची शहर समितीच बरखास्त करा, अशी मागणीच गुरुवारी जाहीरपणे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी सांगितले की लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव झाला. विधानसभेला तर पोटनिवडणुकीत मिळालेली कसबा विधानसभेची एकमेव जागाही गेली. कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या दोन मतदारसंघाबाबत काही आशा होती, मात्र गटबाजीतून ती संधीसुद्धा गेली. दोन्ही जागांवर पराभव झाला. विसर्जित महापालिकेचे २९ नगरसेवक होते, त्यांचेही मागील महापालिका निवडणुकीत अवघे ९ झाले. आता तर अनेक प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवार मिळणेही मुश्कील होईल. याचे कारण म्हणजे पक्षाची संघटना म्हणून पुण्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. शहर समितीमध्येच गटबाजी आहे. त्यामुळे ही कमिटी बरखास्त करणे गरजेचे आहे.

धीवर यांनी सांगितले की पुण्यातील पक्षाचे नेतृत्व कुचकामी ठरत आहे. या कमिटीला मतदारांसमोर कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची आंदोलने यात कमिटीचे काहीही योगदान नाही. या सर्व गोष्टींमुळे पुण्यात पक्षाच्या प्रभावाचा खेळखंडोबा झाला आहे. कमिटी बरखास्त करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर ते चांगले काम करून पक्षाला पुन्हा उर्जितावस्था आणतील. ही मागणी पक्षाच्या राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडेही करणार असल्याचे धीवर यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही पक्षाने पुण्यातील पराभवाची, सतत ढासळत असलेल्या राजकीय शक्तीची दखल घेतली नाही याची खंत असल्याचे दिसते. स्पष्टपणे कोणी बोलत नसले तरीही पक्षाच्या अधोगतीला पुण्यातील नेतेच जबाबदार असल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी आता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणेच थांबवले आहे. नेत्यांमधील गटबाजीमुळे काहीजणांनी पक्ष कार्यालयात येणे बंद केले आहे. विधानसभेला राज्यात पक्षाचा दारूण पराभव झाला, जुन्याजाणत्या नेत्यांचाही पराभव झाला, तरीही केंद्रीय नेतृत्वाने त्याचा ठपका कोणावर ठेवला नाही, तोच प्रकार पुणे शहराच्या बाबतीतही नेते अवलंबत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे