शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 19:50 IST

लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव

पुणे : लोकसभा, त्यानंतर विधानसभेतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला, मात्र पक्षाच्या राज्य किंवा केंद्रीय शाखेनेही या पराभवाला जबाबदार कोण याची साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळेच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच जाहीरपणे रोष व्यक्त होऊ लागला आहे. राहुल प्रियंका सेना नावाच्या संघटनेने तर काँग्रेसची शहर समितीच बरखास्त करा, अशी मागणीच गुरुवारी जाहीरपणे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी सांगितले की लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव झाला. विधानसभेला तर पोटनिवडणुकीत मिळालेली कसबा विधानसभेची एकमेव जागाही गेली. कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या दोन मतदारसंघाबाबत काही आशा होती, मात्र गटबाजीतून ती संधीसुद्धा गेली. दोन्ही जागांवर पराभव झाला. विसर्जित महापालिकेचे २९ नगरसेवक होते, त्यांचेही मागील महापालिका निवडणुकीत अवघे ९ झाले. आता तर अनेक प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवार मिळणेही मुश्कील होईल. याचे कारण म्हणजे पक्षाची संघटना म्हणून पुण्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. शहर समितीमध्येच गटबाजी आहे. त्यामुळे ही कमिटी बरखास्त करणे गरजेचे आहे.

धीवर यांनी सांगितले की पुण्यातील पक्षाचे नेतृत्व कुचकामी ठरत आहे. या कमिटीला मतदारांसमोर कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची आंदोलने यात कमिटीचे काहीही योगदान नाही. या सर्व गोष्टींमुळे पुण्यात पक्षाच्या प्रभावाचा खेळखंडोबा झाला आहे. कमिटी बरखास्त करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर ते चांगले काम करून पक्षाला पुन्हा उर्जितावस्था आणतील. ही मागणी पक्षाच्या राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडेही करणार असल्याचे धीवर यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही पक्षाने पुण्यातील पराभवाची, सतत ढासळत असलेल्या राजकीय शक्तीची दखल घेतली नाही याची खंत असल्याचे दिसते. स्पष्टपणे कोणी बोलत नसले तरीही पक्षाच्या अधोगतीला पुण्यातील नेतेच जबाबदार असल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी आता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणेच थांबवले आहे. नेत्यांमधील गटबाजीमुळे काहीजणांनी पक्ष कार्यालयात येणे बंद केले आहे. विधानसभेला राज्यात पक्षाचा दारूण पराभव झाला, जुन्याजाणत्या नेत्यांचाही पराभव झाला, तरीही केंद्रीय नेतृत्वाने त्याचा ठपका कोणावर ठेवला नाही, तोच प्रकार पुणे शहराच्या बाबतीतही नेते अवलंबत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे