शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 19:50 IST

लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव

पुणे : लोकसभा, त्यानंतर विधानसभेतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला, मात्र पक्षाच्या राज्य किंवा केंद्रीय शाखेनेही या पराभवाला जबाबदार कोण याची साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळेच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच जाहीरपणे रोष व्यक्त होऊ लागला आहे. राहुल प्रियंका सेना नावाच्या संघटनेने तर काँग्रेसची शहर समितीच बरखास्त करा, अशी मागणीच गुरुवारी जाहीरपणे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी सांगितले की लोकसभेला राज्यात सगळीकडेच काँग्रेस व काँग्रेसप्रमुख घटक असलेल्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पुण्यात मात्र पराभव झाला. विधानसभेला तर पोटनिवडणुकीत मिळालेली कसबा विधानसभेची एकमेव जागाही गेली. कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या दोन मतदारसंघाबाबत काही आशा होती, मात्र गटबाजीतून ती संधीसुद्धा गेली. दोन्ही जागांवर पराभव झाला. विसर्जित महापालिकेचे २९ नगरसेवक होते, त्यांचेही मागील महापालिका निवडणुकीत अवघे ९ झाले. आता तर अनेक प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवार मिळणेही मुश्कील होईल. याचे कारण म्हणजे पक्षाची संघटना म्हणून पुण्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. शहर समितीमध्येच गटबाजी आहे. त्यामुळे ही कमिटी बरखास्त करणे गरजेचे आहे.

धीवर यांनी सांगितले की पुण्यातील पक्षाचे नेतृत्व कुचकामी ठरत आहे. या कमिटीला मतदारांसमोर कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची आंदोलने यात कमिटीचे काहीही योगदान नाही. या सर्व गोष्टींमुळे पुण्यात पक्षाच्या प्रभावाचा खेळखंडोबा झाला आहे. कमिटी बरखास्त करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर ते चांगले काम करून पक्षाला पुन्हा उर्जितावस्था आणतील. ही मागणी पक्षाच्या राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडेही करणार असल्याचे धीवर यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही पक्षाने पुण्यातील पराभवाची, सतत ढासळत असलेल्या राजकीय शक्तीची दखल घेतली नाही याची खंत असल्याचे दिसते. स्पष्टपणे कोणी बोलत नसले तरीही पक्षाच्या अधोगतीला पुण्यातील नेतेच जबाबदार असल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी आता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणेच थांबवले आहे. नेत्यांमधील गटबाजीमुळे काहीजणांनी पक्ष कार्यालयात येणे बंद केले आहे. विधानसभेला राज्यात पक्षाचा दारूण पराभव झाला, जुन्याजाणत्या नेत्यांचाही पराभव झाला, तरीही केंद्रीय नेतृत्वाने त्याचा ठपका कोणावर ठेवला नाही, तोच प्रकार पुणे शहराच्या बाबतीतही नेते अवलंबत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे