शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आता आपले सरकार नाही, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:58 IST

आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे वळसे पाटलांचे कार्यकर्त्यांना निर्देश....

मंचर (पुणे): राज्यात आता आपले सरकार नाही. विकासकामांचा ओघ सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मंचर येथील शरद पवार सभागृहात पार पडला. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, मागील पंचवीस - तीस वर्षांपासून कार्यकर्ते व सर्वांनीच मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळेच सात वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी कार्यकर्ते, नागरिक, मतदार यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून संपर्क मोहीम सुरू करावी. नागरिकांच्या अडचणी, शिल्लक प्रश्न प्रमुख कार्यकर्त्यांनी समजून घ्यावेत. अनेक विकासकामे झाली आहेत. कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष दिले पाहिजे.

काही कळायच्या आत आघाडी सरकार जाऊन दुसरे सरकार सत्तेवर आले. त्यासाठी केंद्राने मोठी ताकद लावली, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, लोकांची मने बिघडविण्याचे काम भाजप करीत आहे. महागाई व इतर प्रश्न बाजूला पडून दुसरेच प्रश्न निर्माण केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या गावात जाऊन काम करावे. इच्छुक उमेदवारांनी शिष्टमंडळ आणून ओढाताण करू नये. इच्छुकांनी पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज जमा करावा व निरोपाची वाट पाहावी, असे ते म्हणाले. राज्यात सरकार आपले नाही. विकासकामांचा ओघ सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी सभापती देवदत्त निकम, विष्णू काका हिंगे, संजय गावारी, सुहास बाणखेले, क्रांती गाढवे, नंदा सोनावले, उषा कानडे, रूपा जगदाळे, सुभाष मुरमारे यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अंकित जाधव, भगवान वाघ, सुषमा शिंदे, गणपत इंदोरे, अजय आवटे, कैलासबुवा काळे, शरद शिंदे, अरविंद वळसे पाटील, अजय घुले, भगवान वाघ आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरुणा थोरात यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMancharमंचरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMaharashtraमहाराष्ट्र