शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 18:07 IST

महापालिकेने भुर्दंड सोसल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही

पुणे : वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि धरणांमधील पाण्याचे आरक्षण बिगर सिंचनासाठी वाढविण्यासाठी लागणारा भुर्दंड महापालिकेने सोसावा. या अटींच्या पूर्ततेशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे पुण्याला वाढीव पाणी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या हद्दीत वाढत असलेल्या मोठ्या टाऊनशिपमुळे केवळ ठराविक लोकांची घरे भरली जात आहेत. सामान्यांना पाण्यापासून वंचित ठेवायचे, आणि सरकारला दोष द्यायचा असे चालणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या पाण्याच्या धोरणात महापालिकेलाही सामावून घ्यावे लागले असेही ते म्हणाले.

यशदामध्ये कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यांमधील नदीजोड प्रकल्पांबाबत आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जलसंपदा विभागाने पुण्यासाठी १४ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. प्रत्यक्षात महापालिका २१ टीएमसी पाणी उचलते. तरीदेखील महापालिकेने जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पाण्याच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत असल्याने महापालिकेला नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याचे विखे यांनी या वेळी सांगितले. तरीदेखील नागरिकांना याचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे निर्देशही जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात टाऊनशिप वाढत आहेत. काही ठराविक लोकांची घरे भरली जात आहेत. हे बांधकाम व्यावसायिक सामान्यांचे पाणी पळवित आहेत. त्यामुळे त्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. आणि पाणी कमी पडते म्हणून सरकारकडे बोट दाखवायचे असे चालणार नाही. त्यामुळे महापालिकेलाही धोरणात आणावे लागणार असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. इमारतींना किती पाणी लागणार आहे, पाण्याचा किती पुनर्वापर होणार आहे, याचा हिशेब ठेवण्याचे काम महापालिकेचे आहे. जगातील बहुतांश शहरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापराच्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे पुणे महापालिका का करू शकत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बिगर सिंचनाचे आरक्षण वाढविताना सिंचनाच्या निर्मितीसाठीचा भुर्दंड महापालिकेला उचलावा लागेल, असे सांगून त्यांनी मुंबई, ठाणे या महापालिकांनी धरणांच्या निर्मितीत निधीचा वाटा उचलला आहे. त्याच पद्धतीने पुणे महापालिकेनेही भागीदारी घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अतिरिक्त पाण्याची मागणी करणे सोपे आहे. मात्र, किमान ३० ते ४० टक्के पाण्याचा पुनर्वापर महापालिकेने करावा. त्यामुळे पाण्याचे संवर्धन होऊन ते शेतीसाठी वापरता येईल. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते किती प्रमाणात नदीत सोडले जाते, या अटींची पूर्तता केल्यावर पाण्याचा कोटा वाढवून देता येईल. अन्यथा कोटा वाढवून देण्यासाठी मान्यता मिळणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अतिक्रमणांवर कारवाई करणार

खडकवासला धरण परिसरातील विविध छोट्या-मोठ्या हॉटेलबरोबरच राजकीय नेत्यांची बंगले आहेत. त्याच्याशिवाय अन्य काही अतिक्रमणही आहे. त्याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. कोणाचेही रिसॉर्ट, हॉटेल असू दे, कारवाई होणार म्हणजे होणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

कालवा सल्लागार समितीची बैठक घेणार

जलसंपदामंत्री या नात्याने उजनी कालवा सल्लागार समिती अंतर्गत पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची समितीची बैठक नुकतीच घेतली. त्यानंतर कुकडी धरणाच्या कालवा सल्लागार समिती अहिल्यानगरला घेतली. आता पुणे जिल्ह्याच्या पाणी वापराबाबत लवकरच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ असेही विखे पाटील यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीRainपाऊसDamधरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार