शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:00 IST

आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करतात; कारण त्यांना तीच वारी महत्त्वाची वाटत असावी, आमच्यासाठी मात्र ज्ञानोबातुकोबांचीच वारी महत्त्वाची आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर भाष्य केले. मंत्रिमंडळाचा आकार त्यांना योग्य वाटत असेल तर काय करणार असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्डजवळच्या एका कार्यालयात शिरूर, जालना, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, मात्र त्यांना कदाचित २० जणांचेच मंत्रिमंडळ योग्य वाटत असेल, तसेच महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही हेही योग्य वाटत असेल.

विदर्भातील काही जागांचा आढावाही बैठकीत होणार होता, मात्र तेथील नेते दुसऱ्या कार्यक्रमात असल्याने तो झाला नाही. आता १४ जूनला तो होईल. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साेहळा आहे. त्यानिमित्त १० जूनला नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. पुण्यात आमचे राजकीय वर्चस्व आहे. इथूनही बरेच लोक त्या मेळाव्याला उपस्थित राहतील, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. निवडणूक तयारीच्या दृष्टीने आपापल्या पक्षाचा आढावा कसा घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील. एकत्र घ्यायचे निर्णय हे महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतले जातील, असेही पवार म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर, विशेषतः राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्याबाबत पवार म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही. ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी महाविकास आघाडीनेच प्रयत्न केले. महिलांना राजकारणात आरक्षणासारखे निर्णय कोणी घेतले हे महाराष्ट्रालाच नाही तर देशाला माहिती आहे. राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पवारसाहेब कधीही निर्णय घेत नाहीत, असे पवार म्हणाले.

फाजीलपणा नको, जबाबदारीने काम करा!

तुम्हाला पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचे नाही. तुमच्या भांडणांमुळे तुमची बदनामी नाही तर पक्षाची, पवार साहेबांची बदनामी होते, अशा शब्दात अजित पवार यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना झापले. असेच वागत राहिलात तर मी टोकाची भूमिका घेईन, पदाचा राजीनामा घेईन, असेही पवार यांनी सुनावले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण