शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुणे-सोलापूर महामार्गावर ‘मृत्यू’चे पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:37 AM

महामार्ग प्रशासन, पोलिसांकडून दुर्लक्ष; महामार्गावर उभी राहताहेत धोकादायकरीत्या अवजड वाहने

भिगवण : भिगवण येथे पुणे-सोलापूर महामार्गावरच अनधिकृतरीत्या वाहने पार्किंग केली जात आहे. आतापर्यंत अनेक गंभीर अपघात घडून हकनाक जीव गेले आहेत. मात्र महामार्ग प्रशासन, महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासन लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. तर रस्ते सुरक्षेसाठी नेमलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी कामात कसूर करीत असल्याने अपघातांची संख्या वाढीस लागली असल्याचे दिसून येते.पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे हायवेवर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हिस रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे फळे, व्यावसायिक तसेच भिगवण बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक पुण्याकडून सोलापूरकडे जाणाºया बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग करीत असल्याने आतापर्यंत दोन-चार गंभीर अपघातही घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. याकडे रस्ते सुरक्षेसाठी नेमलेले महाराष्ट्र सुरक्षा बल, टोल प्रशासन आणि वाहतूक पोलीस कोणतीही कडक भूमिका घेत नसल्याने वाहने पार्किंग करणाºयांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. हायवेवर वाहने पार्किंग करू नये. या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्याने काही व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागाच आरक्षित केल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरच गाड्या दुरुस्ती केली जात असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे यावर टोल प्रशासन तसेच महामार्ग पोलीस यांनी तातडीने कारवाई करून या अवैध पार्किंग करणाºयांविरोधात शासन करण्याची गरज असल्याचे सामाजिक संघटना मत व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAccidentअपघातPuneपुणेSolapurसोलापूर