शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:41 IST

कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे.

ठळक मुद्देटेकडीच्या नेहमीच कोसळणाऱ्या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आंबेगाव बुद्रुक : कात्रज बाह्यवळण महामार्गावर सतत कडा कोसळत असून कोणत्याही  उपाययोजना  नाहीत.कात्रज बाह्यवळण महामार्गाची निर्मिती  पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करण्यात आली. आंबेगाव बुद्रुक परिसरात अनेक चढउताराचे रस्ते असल्यामुळे हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे महामार्गाच्या निर्मितीमुळे आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पठार असे दोन भाग निर्माण झाले. रस्ता खोदकाम करून समांतर करण्यात आला. परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे टेकड्यांचे कडे महामार्गावर पडू नयेत, म्हणून प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे  मुसळधार पावसामुळे प्रत्येक वर्षी कडा महामार्गावर कोसळलेला असतोच. प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कात्रज बाह्यवळण रस्ता चर्चेचा विषय ठरत असतो. रस्त्यावर  कात्रज ते नवले पुलादरम्यान लहान-मोठे  खड्डे पडलेले असून ते बुजवले नसल्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे........कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर सेवा रस्ता नसल्याने अनेक प्रवासी उलट्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. या महामार्गाच्या कडेला आंबेगाव बुद्रुक हद्दीत अभिनव शाळेसमोरील असणारे कडे ढासळत असल्याने वाहनचालक भीतीच्या छायेत आहेत.मागील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कडा पडला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी कडा पडला असून त्याच्या बाजूच्या कड्याचा भाग सुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी प्रशासन एखादी घटना घडायची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूkatrajकात्रज