शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:41 IST

कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे.

ठळक मुद्देटेकडीच्या नेहमीच कोसळणाऱ्या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आंबेगाव बुद्रुक : कात्रज बाह्यवळण महामार्गावर सतत कडा कोसळत असून कोणत्याही  उपाययोजना  नाहीत.कात्रज बाह्यवळण महामार्गाची निर्मिती  पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करण्यात आली. आंबेगाव बुद्रुक परिसरात अनेक चढउताराचे रस्ते असल्यामुळे हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे महामार्गाच्या निर्मितीमुळे आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पठार असे दोन भाग निर्माण झाले. रस्ता खोदकाम करून समांतर करण्यात आला. परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे टेकड्यांचे कडे महामार्गावर पडू नयेत, म्हणून प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे  मुसळधार पावसामुळे प्रत्येक वर्षी कडा महामार्गावर कोसळलेला असतोच. प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कात्रज बाह्यवळण रस्ता चर्चेचा विषय ठरत असतो. रस्त्यावर  कात्रज ते नवले पुलादरम्यान लहान-मोठे  खड्डे पडलेले असून ते बुजवले नसल्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे........कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर सेवा रस्ता नसल्याने अनेक प्रवासी उलट्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. या महामार्गाच्या कडेला आंबेगाव बुद्रुक हद्दीत अभिनव शाळेसमोरील असणारे कडे ढासळत असल्याने वाहनचालक भीतीच्या छायेत आहेत.मागील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कडा पडला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी कडा पडला असून त्याच्या बाजूच्या कड्याचा भाग सुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी प्रशासन एखादी घटना घडायची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूkatrajकात्रज