शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा

By नितीन चौधरी | Updated: August 20, 2023 16:11 IST

पाऊस पडला तरी धरणसाठ्यात वाढ न झाल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

पुणे: तब्बल दोन ते तीन आठवड्यांच्या खंडानंतर राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरिपातील बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. हा पाऊस केवळ भीज स्वरूपाचा असल्याने पिकांना जरी दिलासा मिळाला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणखीन जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे राज्यात पेरण्यांना उशीर झाला. मात्र, त्यानंतर जुलैत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या मार्गी लागल्या पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे उडीद मुगासारखी कडधान्याची पिके शेतकऱ्यांना करता आली नाहीत. जुलैनंतर साधारण महिनाभर राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण व पूर्व विदर्बातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाची स्थिती जेमतेमच होती. मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून १८ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. तर १३ जिल्ह्यांतील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवस इतका होता. त्याचा थेट परिणाम पिकांच्या विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, भात, मका यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस जोरदार झाला नसला तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक दिवस सुरू होता. त्यामुळे पिकांमध्ये आंतरमशागत करता येत नव्हती. शेतांत तण माजल्याने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देऊन मजुरांना बोलवावे लागत होते. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीची कामे करता आली.

नागपूर विभागात चांगला पाऊस

राज्यात एक ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत ७८ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या २७.३ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर विभागात १७४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. राज्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अमरावती विभागात ६१.५ मिलिमीटर (२६.५ टक्के) संभाजीनगर ३५ मिलिमीटर (१८.२ टक्के) पुणे विभागात ५१.३ मिलिमीटर (२०.७ टक्के), नाशिक विभागात ३५.२ मिलिमीटर (१७.८ टक्के) तर कोकण विभागात १८८.२ मिलिमीटर (२४.६ टक्के) पाऊस झाला आहे.

''या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी १५ दिवसांनी असाच पाऊस झाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. - विनय आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे'' 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीDamधरणWaterपाणी