शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतरोहित्र न बसवल्याने पाण्याअभावी पिके जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:10 IST

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील रेणुकानगर भागात गेली एक महिना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जळालेले विद्युत रोहित्र न ...

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील रेणुकानगर भागात गेली एक महिना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जळालेले विद्युत रोहित्र न बसविल्यामुळे पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

ज्या ठिकाणी रोहित्र बसविले होते त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्याला रस्त्याची अडचण भासू लागल्याने ५०० फूट पूर्वेकडे शेतीच्या बांधावर रोहित्र बसविण्यास मंजुरी देण्यात आली होती. जागा बदलल्याने विद्युत रोहित्र बसविण्यासाठी तयार करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शेतकरी विजय शिवरकर यांनी केला आहे. पोल स्ट्रक्चरचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. विद्युत रोहित्रचे स्ट्रक्चर एका बाजूला कललेले होते. त्यामुळे विद्युत रोहित्र बसविण्यास तब्बल एक महिना विलंब झाला आणि पर्यायाने पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. दरम्यान, महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे नुकसान झाले असून त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

दरम्यान, संबंधित ठेकेदार संजय खळदकर यांच्याशी शेतकरी सुभाष बोत्रे यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. यावेळी पारगाव महावितरणचे उपअभियंता पप्पू पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला सांगून पोल स्ट्रक्चर पुन्हा उभारले असून, विद्युत रोहित्रासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच त्या ठिकाणी विद्युत रोहित्र बसवले जाईल.

१८ केडगाव पारगाव

पारगाव येथे जळालेले विद्युत रोहित्र दाखवताना शेतकरी.