शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

गाय महत्त्वाची वाटते मग महिला का नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 14:15 IST

‘सेंट मीराज’च्या विद्यार्थिनींकडून सवाल

ठळक मुद्देसक्षमीकरणाकरिता ‘झीरो टॉलरन्स’ पॉलिसी केवळ स्वाक्षऱ्याच नव्हे, तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम

युगंधर ताजणे- 

पुणे : एकीकडे गायीला वाचविण्याकरिता देशपातळीवर आंदोलने छेडली जातात. दुसऱ्या बाजूला हैदराबाद येथील घटनेनंतर अद्याप समाजात महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, ज्या पद्धतीने गाई वाचविण्याकरिता विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्याप्रमाणे महिलांच्या सुरक्षेकरिता का नाहीत, असा सवाल सेंट मीराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.  या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजात महिलेच्या सुरक्षेबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यावर करावी लागणारी उपाययोजना यावर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराचे खटले फास्ट कोर्टमध्ये चालविण्यात यावेत. प्रशासनाने आपल्या कामाच्या माध्यमातून  ‘‘झीरो टॉलरन्स’’ पॉलिसी राबविण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.  दहा डिसेंबरपासून विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. याकरिता ते हॉस्पिटल, झोपडपट्टी, विविध महाविद्यालयांत गेले. तेथील व्यक्ती, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांनी आपली भूमिका समजावून सांगितली. देशात सध्या महिलांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्याविरोधात देशातील वातावरण गंभीर झाले आहे. महिलांवर दररोज होणारे अन्याय व अत्याचाराच्या घटनांनी मन विषण्ण झाले आहे. दर तासाला कित्येक महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. यांच्या मनात अद्याप भीतीचे वातावरण आहे. ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे, अशा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यांना हे हल्ले रोखण्यात अपयश येत आहे. आदरणीय पंतप्रधान यांनी या बाबींचा गंभीरपणे विचार करून प्रशासनापुढे निर्माण झालेला हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. अशा आशयाचे पत्र तयार करून त्यावर सेंट मीराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नागरिकांच्या स्वाक्षरी घेत आहेत. दोषींवर तत्काळ कारवाई करणे, त्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणे आणि भविष्यात नागरिकांमध्ये कायदाविषयक आदर राहावा. अशा प्रकारची विद्यार्थ्यांनी पत्रकातून केली आहे.  केवळ स्वाक्षऱ्याच नव्हे, तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम आम्ही विद्यार्थ्यांनी केले आहे. तुमच्या घरात तुमच्या परवानगीशिवाय कुणी येऊ शकत नाही. तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या शरीराला कुणीही स्पर्श करू शकत नाही. हा मुद्दा घेऊन महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समाजासमोर स्वाक्षरी उपक्रमातून मांडला आहे. आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षºया घेतल्या असून त्याबाबतचे निवेदन पुणे पोलीस आणि पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविणार असल्याची माहिती पूजा सिंग या विद्यार्थिनीने दिले. ............सुरक्षित भारत संकल्पना समोर...सुरक्षित भारत अशी संकल्पना डोळ््यांसमोर आम्ही स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ज्या पद्धतीने आपण गाईला माता संबोधतो आणि तिच्या रक्षणाकरिता धाव घेतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून नजरेआड करता येणार नाही. आज समाजात आपल्या माता, भगिनी, मुली सुरक्षित आहेत का? याविषयी प्रत्येक पालकाच्या मनात काय भावना आहेत? हे समजून घेण्याची गरज आहे. इतर दैनंदिन प्रश्नाविषयी जसे जागरुक राहून आंदोलने करण्यात आपण पुढाकार घेतो, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरण्यात अग्रेसर का राहू नये?    अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. - जी. एच. गिडवानी, प्राचार्य, सेंट मीराज महाविद्यालय, पुणे..........

टॅग्स :PuneपुणेcowगायWomenमहिलाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय