शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:30 IST

पिंपरीमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर टीका केली.

पिंपरी : विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, नोटाबंदी जीएसटीमुळे देशात मंदीची लाट असून केंद्र सरकारच्या नाकार्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण चुकले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिक वाहन विक्रीचे शोरुम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. यास केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कार्यक्रमासाठी आल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कवीचंद भाट, गौतम आरकडे, संजय बालगुडे, मयुर जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘आर्थिक मंदी रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न आखल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्यांचे केवळ निवडणुकांकडे लक्ष आहे. २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला सुखरुप बाहेर काढले. मात्र, कोणताही जागतिक अर्थतज्ज्ञ केंद्र सरकारबरोबर काम करायला तयार नाही. नोटाबंदीमुळे नुकसान झाले असून  जीएसटीमुळे विकासदर घसरला आहे. ’’ ‘‘नवीन किती कारखाने सुरु झाले, किती रोजगार निर्मिती झाली याची माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात औद्योगिकघसरण झाली असून परकीय गुंतवणुकीची माहिती दिली जात नाही. व्यापार सुलभतेत महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावरून १३ व्या क्रमांकावर गेला आहे. औद्योगिक विकासाबाबतची मोगम आकडेवारी न सांगता श्वेत पत्रीका काढावी.’’

पुण्याचे विमानतळ, मेट्रो लांबणीवर का?सरकारवर पुण्याचे विमानतळ का झाले नाही,  मेट्रो लांबणीवर का गेली ? ३० लाख लोकांना रोजगार देण्याचे काय झाले, असे  प्रश्न करीत चव्हाण म्हणाले, ‘‘गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेला घोटाळा, सिडकोतीला घोटाळा, पुण्यातील डीपी घोटाळा, समृध्दी महामार्ग जमीन घोटाळा याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्याची दिशाभूल करु नये. केंद्राच्या  कालावधीत राष्ट्रीयकृत बँकांत ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. निरव मोदी, ललीत मोदी, चोकसी यांचे आश्रयदाते कोण आहेत. त्यांची नावे समोर येऊ द्या.’’

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPoliticsराजकारणBJPभाजपा