शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 13:38 IST

लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नम्रता फडणीस

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून  ‘होम क्वारंटाईन’ झालेल्या व्यक्तींपुढं आता 14 एप्रिलपर्यंत करायचं काय? असा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेमुळे  व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी ’लोकमत’प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनीही या शक्यतेला काहीसा दुजोरा दिला असून, ‘मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

‘होम क्वारंटाईन’ मुळे कोणत्या मानसिक समस्यांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे?- पहिली म्हणजे  ‘चिंता’. कारण अनिश्चितता आली की चिंता येते. कुठलीही नकारात्मक भावना तिची तीव्रता, कालावधी आणि मग पुनरावुत्ती या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे भावनांचा माणूस म्हणून अनुभव हा येतचं असतो. पण या तीन गोष्टींना आजार कधी म्हणायचं तर यात वुद्धधी झाली तर अनिश्चिततेमुळे चिंता आपोआप वाढते. आपल्यावरची बंधन इतकी आहेत कि आपल्या परिघातल्या गोष्टी कमी झाल्या आहेत. दुसरं या चिंतेचे पर्यावसन हेनैराश्यात होऊ शकतं. कुठेचं काही मार्ग मिळत नाहीये. मग नैराश्य वाढू शकतं. तिसरं म्हणजे नातेसंबंधातील ताणतणाव यात भर पडू शकते. कारण शहरात लोकांना एकमेकांबरोबर राहाण्याची सवय नाहीये आणि मिळालेल्या वेळेचा विधायक उपक्रम करण्याचं टीम वर्क जर कमी पडलं तर नाते संबंधात तणाव हे पालक आणि मुलांच्या नातेसंबंधात देखील तणाव येऊ शकतात. चौथा भाग म्हणजे ज्यांना गतिमान आयुष्य जगण्याची सवय झाली आहे, त्यांना ही शांतता किंवा ही स्थितीशीलता खायला उठते. त्यातून मग चिडचिड होण्याचं प्रमाण वाढतं.या गोष्टी होणारचं. त्यात भर म्हणजे जे मानसिक रूग्ण आहेत त्यांच्या आजारातही वाढ होण्याची शक्यता आहे.

यातून मग व्यसनाधीनतेला आमंत्रण मिळू शकेल असं वाटतं का ?

- हो का नाही. घरी बसल्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडं स्टॉक आहे तोपर्यंत ती चालू राहाणार. किंबहुना त्यात वाढ होणार. मग ती तंबाखू, सिगरेट आणि दारू असू देत. लोक या शिकारीसाठी नक्कीच बाहेर पडणार. त्यामुळं व्यसनाधीनतेमध्ये होणारी वाढ आणि व्यसनाधीनता सक्तीनं बंद करावी लागल्यामुळं येणारे विड्रॉल हा देखील गंभीर मानसिक आजारचं आहे. कुणाला असा विड्रॉल आला तर ही उपचारासाठीची संधी आहे असं समजून जवळच्या रूग्णालयात दाखल व्हा.

सध्याच्या स्थितीत मानसिक आजाराला कसं टाळता येईल?- आता पालक आणि मुलांचंच उदाहरण पाहा. पालकांना मुलांना सतत घराबाहेर पिटाळण्याची सवय असते. मात्र आता मुलांना बाहेर जायला मिळत नाहीये. त्यामुळे पालकांसमोर  गहन प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पालक आणि मुलांमधील संवाद बळकट करण्याची ही चांगली संधी आहे. असं मानायला हवं. माध्यमांचाही योग्य पद्धतीनं वापर करायला हवा. वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या दिवसाचं योग्य नियोजन करा. विकास, विरंगुळ्यासाठी उपक्रम आखले पाहिजेत. स्क्रीन बंद करून एकमेकांसाठी वेळ द्यायला पाहिजे. एकत्र गाणं, पदार्थ बनविणं हे पातळीवर व्हायला हवं.

समाजाचं मानसिक स्वास्थ उत्तम राहाण्यासाठी मानसोपचार तज्ञांची यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे?- आम्ही तीन तास ओपीडी सुरू ठेवली आहे. एवढी बंधन असूनही रोज पाच ते सहा मानसिक आजाराशी संबंधित रूग्ण येत आहेत. आम्ही व्हॉटसअप आणि आॅनलाईनद्वारे समुपदेशन सुरू केले असून, जुन्या रूग्णांना आॅनलाईन प्रिस्क्रिप्शन पाठवत आहोत. नवीन जे रूग्ण येतील त्यांच्यासाठी कायकरायचं हा प्रश्न आहे. लोक येणार कसं? मग त्यांनी जवळच्या क्लिनिक मध्ये जाणं आणि मग आम्ही संबंधित डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन लिहून दे असं सांगण्याशिवाय पर्याय नाही.

शासकीय पातळीवर काय होणं आवश्यक आहे असं वाटतं?-आता तरी मानसिक आरोग्याचा वेगळा समावेश अत्यावश्यक सेवेत करायला हवा. आधीच मानसोपचार तज्ञांची संख्या कमी आहे. तसं केलं तर सावधानी ठेवून ओपीडी सुरू ठेवता येतील. काही ठिकाणी पोलिसांनी ओळखपत्र दिले आहे. पण सर्व ठिकाणी हे नाही.एमएमसीने प्रिस्क्रिपशन आॅनलाईन देण्याला परवानगी दिली आहे. पण आमची  शेड्यूल औषधे आहेत. केमिस्ट ही औषधे देत नाहीत. मानसिक रूग्ण घराबाहेर पडला तर पोलीस त्याला हे आवश्यक आहे का? असं म्हणतील म्हणून ही वरील मागणी आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMental Health Tipsमानसिक आरोग्य