शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

Corona virus : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 7:34 PM

महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले..

ठळक मुद्देपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने नाराजी

पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांसाठी सुरक्षा कवच ही योजना लागु केली आहे. या योजनेतून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर या योजनेत पीएमपी अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी महामंडळाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटूंबियांना एक कोटी रुपये तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही अशाच प्रकारचे सुरक्षा कवच तेथील कर्मचाऱ्यांना दिले आहे. मात्र, या योजनेतून पीएमपी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी पीएमपी कामगार युनियनने पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे सुरक्षा कवच योजनेत समावेशाबाबत मागणी केली होती. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी गुरूवारी एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. पीएमपीकडून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० हून अधिक मार्गांवर सुमारे ११० बसमार्फत सेवा पुरविली जात आहे. या बस दररोज रात्री स्वच्छ केल्या जातात. पीएमपीची पुष्पक शववाहिनीही पुरविली जात आहे. पुणे महापालिकेच्या विविध रुग्णालयातील १२८ परिचारिकांना शुक्रवारपसाून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. तसेच महापालिकेने त्यांच्या वाहनांसाठी पीएमपीचे २५ चालकही घेतले आहेत. या यंत्रणेमध्ये पीएमपी अधिकाºयांसह शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यां नाही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे त्यांनाही सुरक्षा कवच योजना लागु करण्याची मागणी युनियनने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस