शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 14:54 IST

कोरोनाचा साखर कारखान्यांना फटका

ठळक मुद्देसध्या राज्यातील साखर कारखाने सुरू : ऊस तोड कामगारांनी काम सोडून धरला घरचा रस्ताकारखाने देणार एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य

सोमेश्वरनगर : कोरोनाच्या धास्तीने ऊसतोडणी कामगार आता साखर कारखान्यावर थांबण्यास तयार नसून त्यांनी काम सोडून गावाकडचा रस्ता धरला आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सहा ते सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कारखान्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकºयांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातील साखर कारखानदारीला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. सध्या राज्यातील साखर कारखाने सुरू होते. मात्र, ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडण्यास मनाई केल्याने आता ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेचा कणा मोडण्याचे चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यात बारा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्याचे लोण महाराष्ट्रभर पसरले असून ऊस तोडणी कामगारांनी एल्गार केला. कारखाने बंद करा आम्हाला आमच्या गावाला जाऊद्या असे म्हणत बंद पुकारला आहे.पुणे जिल्ह्यात अजून सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, संत तुकाराम आणि भीमाशंकर हे साखर कारखाने सुरू आहेत. या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून सहा ते सात लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक असून ऊसतोडणी कामगारांच्या बंद मुले ऊस उत्पादक शेतकºयांचा हजारो एकरांवरील ऊस शिल्लक राहिला तर शेतकºयांचे कंबरडे मोडणार आहे. तर शेतकºयांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. एकीकडे साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखाने सुरू ठेवावेत असे आदेश दिले आतांनाही जर ऊसतोडणी कामगार जर निघूनच गेले तर शिल्लक उसाची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न साखर कारखान्यांना भेडसावत आहे.साखर कारखाना बंद करा, आणि आम्हाला आमच्या गावाला सोडा असे म्हणत ऊसतोडणी कामगारांनी ऊस वजन काट्यावरच आंदोलने सुरू केले आहे. शेकडो ऊस तोडणी कामगार व महिला कामगार हे आता उघडपणे रस्त्यावर उतरत कारखाने बंद करा असा नारा देत आहेत.याबाबत ऊसतोडणी कामगार म्हणाले की, रस्त्याने माणूस दिसेना, तुम्ही तुमच्या घरात आरामात बसला आहे, बागायतदार साधा उसाच्या फडात पण येत नाही, आमच्या गावातही म्हतारी माणसं, लहान लहान लेकरं आहेत, आम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे, या आजारामुळे सगळंच महागले आहे, तेल महागले, शेंगदाणे महागले आम्ही जगणार कसे शेजारी साखर कारखाना असून आम्हाला ४५ रुपये किलोने साखर खावी लागते तर गावाला आमची लहान लहान मुले आहेत म्हतारी माणसे आहेत, आम्हाला त्याच्याकडे जाउंदे अशी विनवणी केली.----------------कारखाने देणार एक महिना पुरेल एवढे अन्नधान्यकारखान्याच्या कार्यक्षेत्रात उभा असलेला ऊस संपवण्यासाठी व ऊस तोडणी कामगारांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे....................गेटकेन चा फटकाअनेक कारखाने ऊसाचे जास्त गाळप करण्यासाठी शेतकºयांचा ऊस पाठीमागे ठेऊन गेटकेन उसाचे गाळप करतात, कारखान्याच्या मालकाचा ऊस ठेवायचा आणि परक्याचा ऊस गाळायचा अशी काही कारखान्यांची मानसिकता आहे. आज हीच मानसिकता सभासदांच्या मुळावर उठली आहे.....................उस उत्पादक शेतकरी धास्तावलाराज्यातील ऊसतोडणी कामगारांनी  बंदचा एल्गार पुकारल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी  धास्तावला आहे. एकतर दोन महिन्यांपूर्वी जाणारा ऊस अजून शेतातच उभा, त्यात वजन घटले आहे आता ऊसतोडणी कामगार निघूनच गेला तर काय करणार, कसे उसाचे गाळप होणार या चिंतेने शेतक?्याला ग्रासले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार