शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

Coronavirus| लसीकरणामुळे पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 2:46 PM

मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. दुसऱ्या लाटेत बहुसंख्य रुग्णांना श्वसनाचा त्रास झाला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. पण, तिसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसत नाहीत. विषाणूमधील बदल आणि लसीकरण यामुळे तिसरी लाट सध्यातरी सौम्य असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाल्याने तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात भरती होण्याचे, तीव्र लक्षणांचे प्रमाण कमी आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये बेशिस्त वर्तन कायम असल्याची बाब तज्ज्ञांनी अधोरेखित केली.

पहिली लाट : मार्च ते सप्टेंबर २०२०

सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २४.८६ टक्के

दुसरी लाट : फेब्रुवारी ते मे २०२१

सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २६ टक्के

तिसरी लाट : डिसेंबर शेवटच्या आठवड्यास सुरुवात

संभाव्य पॉझिटिव्हिटी रेट : २८ ते ३० टक्के

२०२१ मधील स्थिती :

सर्वात कमी रुग्णसंख्या - ९८ (२५ जानेवारी)

सर्वाधिक रुग्णसंख्या - ७०१० (८ एप्रिल)

सर्वात कमी सक्रिय रुग्ण - १३८३ (७ फेब्रुवारी)

सर्वाधिक सक्रिय रुग्ण - ५६६३६ (१८ एप्रिल)

पहिल्या लाटेमध्ये कोरोना विषाणू आपल्यासाठी पूर्णतः नवीन होता. त्यामुळे उपाययोजना करताना आरोग्य यंत्रणाही गोंधळलेली होती. मृत्युदरही काहीसा जास्त होता. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला. बहुतांश रुग्णांना तीव्र संसर्गाचा सामना करावा लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, स्टेरॉइड्स यांचा तुटवडा जाणवला, आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण निर्माण झाला. तिसरी लाट ही दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण झाली आहे. ८० टक्के ओमायक्रॉन आणि २० टक्के डेल्टा असे प्रमाण अपेक्षित आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक अनुभवायला मिळेल आणि नंतर तिसरी लाट ओसरू लागेल. यादरम्यान रुग्णसंख्येचे प्रमाण वाढले आणि त्यातील १ टक्का रुग्णांना हॉस्पिटलची गरज भासली तरी आरोग्य यंत्रणेला पुन्हा सज्ज राहावे लागणार आहे. लसीकरण बऱ्यापैकी झाले असल्याने यंदा रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

पहिल्या लाटेमध्ये कोरोनाबाबत कोणतेही संशोधन नव्हते. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटली. मात्र मृत्युदर आणि रुग्णसंख्या रोखण्यास तो यशस्वी ठरला. पहिल्या लाटेतून शासन आणि नागरिकांनीही धडा न घेतल्याने मोठा फटका बसला. आरोग्य यंत्रणेची तयारीही कमी पडल्याने प्रचंड ताण निर्माण झाला. तिसऱ्या लाटेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली आहे. त्यामुळे मृत्युदर कमी राहील, लसीकरणामुळेही मोठा हातभार लागला आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये नागरिकांचे बेशिस्त वर्तन कायम राहिले आहे. नियम न पाळल्याने आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य