शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

टेमघर धरण बांधताना भेगा बुजविण्याचे कामच नव्हते झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:26 IST

साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली.

ठळक मुद्देअवघ्या दहा वर्षांत आली गंभीर गळतीची वेळटेमघर धरण बांधताना भेगा बुजविण्याचे कामच नव्हते झाले 

पुणे : साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली. धरण बांधतानाच अत्यंत महत्त्वाच्या ग्राऊटींगचे (भेगा बुजविणे) कामच केले नाही. तसेच, धरणासाठी क्रश सँडचा अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या वापरामुळे काही वर्षांतच धरणातून धोकादायक पाणी गळती झाल्याची कबुली जलसंपदाच्या अधिकाºयांनी दिली. 

कृष्णा खोरे लवादामधे महाराष्ट्राच्या वाट्याला ५९४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आले. पावणेसहा कोयना धरणे मावतील इतके हे पाणी होते. राज्याला हे पाणी २००० सालापूर्वी अडवायचे होते. अन्यथा पुन्हा पाणी वाटपाच्या नव्या सूत्राला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे १९९६ साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करुन अनेक धरणे बांधली. त्यातीलच टेमघर हे एक धरण. या धरणाचे काम २०० साली झाले. मात्र, त्याचे कामच निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे अधिकारीही मान्य करीत आहेत. याबाबत माहिती देताना जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, धरणाचे कामच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यावेळी धरणा बांधताना नैसर्गिक वाळू उपलब्ध नसल्याने क्रश सँड वापरली. मात्र, या प्रकारच्या वाळूचा वापर करताना विशिष्ट पद्धतीच्या तंत्राचा वापर करावा लागतो. तो देखील केला नाही. धरणाचे काम झाल्यानंतर राहीलेल्या भेगा बुजविण्यासाठी ग्राऊटींग करावे लागते. ते कामही झाले नव्हते. धरणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर वन विभागाने त्यांच्या ७ एकर जमीनीबाबत आक्षेप घेत काम थांबविले. त्यामुळे अपुरे राहीलेले कामही करता आले नाही. त्याची देखभालही पुरेशा प्रमाणात झाली नाही. त्यामुळे धरणातील गळती वाढली. 

देखभाल दुरुस्तीचा खर्च घेणार ठेकेदाराकडूनटेमघर धरणाची धरणाची ठेकेदार कंपनी श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवासा-प्रोग्रेसिव्ह या भागिदार कंपनी मार्फत ही कामे झाली. आता,संबंधित कंपन्या अस्तित्वात नाहीत. त्यांच्या प्रवर्तकांवर न्यायालयात तीन दावे दाखल आहेत. सध्या, धरणाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्या पैकी ५८ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, हा खर्च १४५ ते १५० कोटींवर जाईल. हा खर्च ठेकेदार कंपनीच्या प्रवर्तकांकडून वसूल करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.   

टॅग्स :DamधरणWaterपाणी