शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

शेतकऱ्यांना दिलासा! एफआरपीतून वीजबील वसूल करण्याचा महावितरणचा प्रयत्न असफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 6:35 PM

थकबाकीदार शेतकऱ्याची (Farmers) संमती असेल तरच अशी वसूली करावी अशी भूमिका अखेर महावितरणने घेतली

पुणे : शेतकऱ्यांच्या वीज बीलाची थकबाकी त्यांना साखर कारखान्यांकडून उसासाठी मिळणाऱ्या एफआरपीमधून (FRP) कपात करण्याचा महावितरणचा (Mahavitaran) प्रयत्न यंदाही अयशस्वी ठरला आहे. थकबाकीदार शेतकऱ्याची संमती असेल तरच अशी वसूली करावी अशी भूमिका अखेर महावितरणने घेतली आहे.

राज्यात (Maharashtra) महावितरणचे ४२ लाख ६० हजार ४३१ कृषी ग्राहक आहेत. त्यांच्याकडे तब्बल ३७ हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी सन २०२० मध्येच सरकारच्या संमतीने महावितरणने विविध उपयोजना जाहीर केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत, नगरपालिका, साखर कारखाने यांनी ठराव करून वीज बील वसूली करून द्यावी, त्या बदल्यात त्यांना वसूल रकमेच्या १० टक्के रक्कम मिळेल याचा समावेश आहे. तेव्हापासूनच या निर्णयाला तीव्र विरोध झाला. यावेळी पुन्हा नव्याने तीच पद्धत अवलंबण्याचा महावितरणचा प्रयत्न विरोधामुळेच बारगळला आहे.

आधीच एफआरपी तीन हप्त्यात देण्यासंबधी केंद्र व राज्य सरकार यांच्यात विचार सुरू आहे. नीती आयोगानेच तशी शिफारस केल्याने याला महत्व आले आहे. त्याला स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह, भारतीय किसान मोर्चा, किसान संघ, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्वच संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता पुन्हा वीज बील वसूलीचा विषय आल्यामुळे त्याला विरोध होत आहे.

काही साखर काऱखान्यांनीही या वसूलीला विरोध केला आहे. साखर कारखान्यांचे आधीचे व्याप बरेच आहे, त्यात हे नवे वसुलीचे काम त्यासाठी पैसे मिळणार असले तरी नको अशी भूमिका काही कारखान्यांनी घेतली आहे. त्यामुळेच यंदाही महावितरणचा कृषी ग्राहकांची वीजबील थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न बारगळल्यात जमा आहे. 

''वास्तविक अशा वसुलीचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी धोरणातच आहे, शेतकऱ्यांची संमती असेल तरच ही वसूली होईल.. कारखान्यांनी १०० कोटी रूपये वसूल करून दिले तर त्यांना थेट १० टक्के म्हणजे १० कोटी रूपये मिळणार आहेत. ते मिळवायचे की नाही हा निर्णय त्यांचा आहे असे पुणे महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकूश नाळे यांनी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीजSugar factoryसाखर कारखाने