शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

‘जीवितनदी’कडून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:31 AM

मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत.

पुणे - मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. विठ्ठलवाडी येथील चार ठिकाणी पाणथळ जमिनीवर त्यांनी काम केले असून, अजून तीन ठिकाणी तसे प्रदेश आढळून आले आहेत. या प्रदेशांचे संवर्धन होण्यासाठी त्यांना हेरिटेज घोषित करावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे, असे जीवित नदीच्या अदिती देवधर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस वेटलँड्स डे म्हणून साजरा केला जातो. १९९७ पासून जगात हा दिन साजरा होतो. या दिनानिमित्त जीवितनदी संस्थेकडून या जमिनी संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यावर ते गेल्या अनके वर्षांपासून काम करीत आहते. खरंतर मुठा नदीकाठी सिमेंटचे बांधकाम झाल्याने त्या ठिकाणच्या सर्व पाणथळ जमिनी नष्ट झाल्या आहेत. तसेच त्या या सिमेंटच्या भिंतीमुळे निर्माण होऊ शकत नाहीत. तरी देखील काही भागात अशा पाणथळ जमिनी आहेत. त्या संरक्षित करणे आवश्यक आहे. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. प्लवरसारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा आहेत.जीवितनदीकडून संरक्षणासाठी कामप्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवरसुद्धा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते, असे काम जीवितनदी करीत आहे.अदिती देवधर यांनी आणि त्यांच्या टीमने यासाठी काम सुरू केलेले आहे. या टीमने पाणथळ जागा शोधून तिथे ते संरक्षित करण्यासाठी प्रत्येक रविवारी काम सुरू केले आहे.पाणथळ प्रदेश म्हणजे काय?नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी काठावर उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या जमिनीला पाणथळ म्हटले जाते. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. या पाणथळ जमिनीत अनेक जीवजंतूंची परिसंस्थाच असल्याचे दिसते. या जीवजंतूंवरच अनेक पक्षी आपले अन्न शोधतात.पाणथळ प्रदेशाचा उपयोगपाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात.सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाºयांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते.शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील मॅनग्रुव (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते.नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.नदीकाठी पाणथळ जमिनी असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या वर्षी राजाराम पुलालगत असलेल्या एका पाणथळ जमिनीवर काम केले होते. अशा पाणथळ जमिनी मार्क करून त्यांना संरक्षित केले पाहिजे. कारण त्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. जैवविविधता अहवालात आम्ही गेल्या वर्षी या जमिनी मार्क करून संरक्षित कराव्यात, असे लिहिले होते.- पुर्णिमा आगरकर,पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी