शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

‘जीवितनदी’कडून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 03:31 IST

मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत.

पुणे - मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. विठ्ठलवाडी येथील चार ठिकाणी पाणथळ जमिनीवर त्यांनी काम केले असून, अजून तीन ठिकाणी तसे प्रदेश आढळून आले आहेत. या प्रदेशांचे संवर्धन होण्यासाठी त्यांना हेरिटेज घोषित करावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे, असे जीवित नदीच्या अदिती देवधर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस वेटलँड्स डे म्हणून साजरा केला जातो. १९९७ पासून जगात हा दिन साजरा होतो. या दिनानिमित्त जीवितनदी संस्थेकडून या जमिनी संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यावर ते गेल्या अनके वर्षांपासून काम करीत आहते. खरंतर मुठा नदीकाठी सिमेंटचे बांधकाम झाल्याने त्या ठिकाणच्या सर्व पाणथळ जमिनी नष्ट झाल्या आहेत. तसेच त्या या सिमेंटच्या भिंतीमुळे निर्माण होऊ शकत नाहीत. तरी देखील काही भागात अशा पाणथळ जमिनी आहेत. त्या संरक्षित करणे आवश्यक आहे. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. प्लवरसारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा आहेत.जीवितनदीकडून संरक्षणासाठी कामप्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवरसुद्धा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते, असे काम जीवितनदी करीत आहे.अदिती देवधर यांनी आणि त्यांच्या टीमने यासाठी काम सुरू केलेले आहे. या टीमने पाणथळ जागा शोधून तिथे ते संरक्षित करण्यासाठी प्रत्येक रविवारी काम सुरू केले आहे.पाणथळ प्रदेश म्हणजे काय?नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी काठावर उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या जमिनीला पाणथळ म्हटले जाते. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. या पाणथळ जमिनीत अनेक जीवजंतूंची परिसंस्थाच असल्याचे दिसते. या जीवजंतूंवरच अनेक पक्षी आपले अन्न शोधतात.पाणथळ प्रदेशाचा उपयोगपाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात.सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाºयांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते.शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील मॅनग्रुव (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते.नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.नदीकाठी पाणथळ जमिनी असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या वर्षी राजाराम पुलालगत असलेल्या एका पाणथळ जमिनीवर काम केले होते. अशा पाणथळ जमिनी मार्क करून त्यांना संरक्षित केले पाहिजे. कारण त्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. जैवविविधता अहवालात आम्ही गेल्या वर्षी या जमिनी मार्क करून संरक्षित कराव्यात, असे लिहिले होते.- पुर्णिमा आगरकर,पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी