शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

काँग्रेसचा ‘संविधान बचाव’चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 8:48 PM

नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आले असून दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत काँग्रेस व मित्रपक्ष-संघटनांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला आहे. आता प्रचारामध्ये ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत संविधान बचाव कोपरा सभा व संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला जाणार आहे.

पुणे : नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आले असून दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत काँग्रेस व मित्रपक्ष-संघटनांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला आहे. आता प्रचारामध्ये ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत संविधान बचाव कोपरा सभा व संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला जाणार आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहूल डंबाळे यांच्यासह पिपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट), दलित पँथर, भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, स्वारिप युथ रिपब्लिकन आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बागवे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात संसदीय लोकशाही प्रणाली धोक्यात आली आहे. देशभरात मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांमध्ये दलित व अल्पसंख्यांकाना लक्ष्य करण्यात आले. संविधान बदलण्याची भाषा त्यांचे मंत्री उघडपणे करत आहेत. विविध शासकीय संस्थांचा दुरूपयोग सुरू आहे. संविधानात्मक हक्क अधिकार व संस्थांची पायमल्ली सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ हे अभियान दि. २० एप्रिलपर्यंत राबविले जाणार आहे.  

अभियानांतर्गत शहरातील दलित, अल्पसंख्याक तसेच इतर समाज घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी शंभरहून अधिक संविधान बचाव कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. यामध्ये दोन्ही काँग्रेससह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. शुक्रवारपासून या सभांना सुरूवात झाली आहे. तसेच दि. १४ एप्रिलपासून संविधान बचाव संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.  

प्रकाश आंबेडकरांमुळे मतांचे विभाजन

वंचित विकास आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर मतांचे विभाजन करून जातीयवादी पक्षांना मदत करत असल्याचा आरोप रमेश बागवे व राहूल डंबाळे यांनी केला. पण दलित चळवळीतील कार्यकर्ते आंबेडकरांना मदत करणार नाहीत. रिपल्बिकनचे गट एकत्र येऊन निवडणुक लढविण्याचा प्रयोग आधी झाला होता. पण त्यात यश आले नाही. उलट भाजपा-शिवसेनाला फायदा झाला. काँग्रेससोबत गेल्यानंतर चार खासदार झाले होते. त्यामुळे आम्ही काँग्रेसला सहकार्य करणार असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस