शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 01:26 IST

जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

पुणे : जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, या पैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.सर्वाधिक ५० हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. तर १ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर रागी रोपवाटिकेच्या पेरण्या झाल्या. यावर्षी प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून ३४२ टक्के एवढ्या क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मि.मी. एवढे आहे. जून नैर्ऋत्य मोसमी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची लगबगही सुरू झाली. जिल्ह्यात खरीप पिकांचे २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत २ लाख ३० हजार ४५२ क्षेत्रावर पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी मका आणि इतर तृणधान्य यांची जवळपास ९४ हजार ५९६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. तर ९० हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला, फूल आणि चारा या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भातपिकाचे क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ ५ हजार ८२0 क्षेत्रावर भातलावणी झाली. नंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे पुनर्लागवड लांबली असून, आजअखेर ५० हजार ८१४ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत.शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या भागात बाजरीचे पीक घेतले जाते. सर्वसाधारण ४४ हजार ९४ हेक्टरवर बाजरी पीक घेतले जाते. आतापर्यंत २८ हजार ७९३ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र सरासरी ११ हजार १८३ हेक्टर असून, आतापर्यंत १२ हजार ५५३ हेक्टरवर मक्याच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सरासरी ३ हजार ५५३ हेक्टरवर तुरीचे पिके घेतले जाते. यावर्षी या क्षेत्रात घट झाली असून केवळ ७०६ हेक्टरवर म्हणजे २० टक्केच पेरणी झाली आहे.>सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढजिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र सरासरी ५ हजार १९९ हेक्टर एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि बारामती या तालुक्यांत सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते.यावर्षी तब्बल १७ हजार ७८३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर कांदाच्या क्षेत्रही वाढले असून, गतवर्षी २ हजार १५५ हेक्टरवर कांद्याचे उत्पादन करण्यात आले. यावर्षी ३ हजार ७७४ हेक्टरवर कांद्याची रोपे लावण्यात आली. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून पेरणीच्या अंतिम टप्प्यात पावसाने दडी मारली आहे. मुगाचे क्षेत्र ८ हजार ६९ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ९०० म्हणजेच ७३ टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीच्या वेळी पावसामध्ये खंड पडल्यामुळे मूग पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्र ४१ हजार ४०९ हेक्टर असून, आतापर्यंत ३३ टक्के म्हणजे १३ हजार ७०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तूर, मूग, उडीद यासह इतर खरीप कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कडधान्याच्या क्षेत्रात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.गतवर्षी २ हजार १७० हेक्टरवर तूर पेरणी करण्यात आली. यावर्षी केवळ ७०६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. १७ हजार ७२० हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यावर्षी ५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी