शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, कारवाईवरुन मनसेच्या रुपाली पाटलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:20 PM

स्थानिक नगरसेवकांची ही जबाबदारी आहे, त्यानंतर महापौरांनी लक्ष घालून आयुक्तांना सांगून कारवाई तात्काळ थांबवायला पाहिजे होती. जर, महापालिकेतील भाजपा सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर, महाविकास आघाडी सरसकारने लक्ष द्यायला हवे होते

ठळक मुद्देआयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, सकाळपासून फोन उचलत नाहीत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की फोन उचलून कारवाई थांबवली पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे - पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमणे हटविण्याला गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी आक्रमक रूप धारण करत या कारवाईला जोरदार विरोध केला. महापालिका न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीची सुनावणी झाली. मात्र, या घटनेनंतर प्रशासन आणि नेतेमंडळींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनसेच्या रुपाली पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन आयुक्तांसह राजकीय नेत्यांवर प्रहार केला आहे.  

स्थानिक नगरसेवकांची ही जबाबदारी आहे, त्यानंतर महापौरांनी लक्ष घालून आयुक्तांना सांगून कारवाई तात्काळ थांबवायला पाहिजे होती. जर, महापालिकेतील भाजपा सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर, महाविकास आघाडी सरसकारने लक्ष द्यायला हवे होते. मात्र, सगळ्यांची मिलीभगत आहे, बिल्डरशी सगळ्यांचे लागेबांदे आहेत, असा आरोप मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. गोरगरीब लोकांची ही वस्ती आहे, अनेकांच्या अनेक समस्या आहेत, लहान मुलं, बाळांतीण आई, लोकांचा आक्रोश, कष्टकरी लगेच कुठं जाणार?, ही लोकं स्थलांतरीत व्हायला तयार आहेत, असे रुपाली पाटील यांनी म्हटले. 

आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, सकाळपासून फोन उचलत नाहीत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की फोन उचलून कारवाई थांबवली पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सुप्रिम कोर्टाचे काही आदेश आहेत, त्यानुसार कोरोना व सद्यस्थिती अशी कारवाई करता येत नाही. पण, राजकारणाची पातळी अत्यंत खालावल्याचं या घटनेवरुन दिसून येतं. लोकांचा तळतळाट घेऊ नका, कोरोनानंतरही असलं राजकारण करु नका, असेही पाटील यांनी म्हटले. 

न्यायालयाच्या आदेशात या भागातील कुटुंब विस्थापित होणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाचं न्यायालयासमोर नाही. अशावेळी नागरिकांना उध्वस्त करणे उचित ठरणार नाही. जोपर्यंत या नागरिकांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती देत आहोत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान सुरू झालेला नागरिक व प्रशासन यांच्यातला तीव्र संघर्ष तात्पुरता संपण्याची शक्यता आहे. पुण्यातील आंबील ओढ्याजवळचा कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली होती.

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेMayorमहापौरBJPभाजपा