शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सर्पदंश झाल्याने चिमुरडीचा मृत्यू

By admin | Updated: May 25, 2014 05:06 IST

शहरातील कसबा येथील चिमुरडीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. शीतल अर्जुन बामणे (वय ६, रा. जामदार रोड, कसबा, बारामती) असे या चिमुरडीचे नाव आहे

बारामती : शहरातील कसबा येथील चिमुरडीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. शीतल अर्जुन बामणे (वय ६, रा. जामदार रोड, कसबा, बारामती) असे या चिमुरडीचे नाव आहे. बामणे कुटुंबीयांचे जामदार रोडलगत पत्र्याचे घर आहे. याच घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी (दि. १२) पहाटे चार वाजता शीतलने तिच्या वडिलांना झोपेतून उठविले. या वेळी तिने घरात मोठा साप निघाल्याचे सांगितले. तिचे वडील अर्जुन यांनी घरात पाहणी केली. त्यानंतर घरात मण्यार जातीचा विषारी साप फिरत होता. अंधार असल्याने त्यांनी या सापाला मारून फेकून दिले. मात्र शीतलला यापूर्वीच सर्पदंश झाला होता. ते कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने शीतलने ‘कानाला ऊस कापला आहे,’ अशी वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर अर्जुन यांनी तिच्या कानातून चिकट स्राव येत असल्याचे पाहिले. याच वेळी तिला सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पत्नीसह शीतलला घेऊन त्यांनी तातडीने सिल्वर ज्युबिली रुग्णालय गाठले. मात्र, या ठिकाणी एका महिलेच्या प्रसूतीसाठी डॉक्टर व्यस्त होते, त्यामुळे अर्जुन यांनी एका खासगी रुग्णालयात शीतलला नेले. या ठिकाणी पुन्हा लहान मुलांच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये तिला पाठविण्यात आले. डॉ. मुथा यांनी तातडीने तिला दाखल करून उपचार सुरू केले. मात्र या दरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली. सकाळी ११ वाजता तिचे हृदयही बंद पडले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र, तिची प्रकृती गंभीर झाली. मंगळवारी (दि. १३) पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. सर्पज्ञान नसल्याने पालकांना लक्षात आले नाही. शीतलवर आलेली वेळ इतरांवर येऊ नये. आजही सापांविषयी अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करणे गरजेचे आहे, अन्यथा किती ‘शीतल’चा बळी केवळ अज्ञानामुळे जाईल, याची कल्पना आपण करू शकणार नाही, असे सर्पमित्र कांबळे, अर्जुन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.