शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

SSC Exam 2025: मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:17 IST

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे

पुणे: राज्यातील नऊ विभागातील ५ हजार मुख्य केंद्रांवर उद्यापासून (दि. २१) इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा सुरू होणार आहे. राज्यातील एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १६५ ने जास्त आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांमध्ये २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या दरम्यान इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी देणार आहेत. यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतियपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागील वर्षी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदात यात २ हजार १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

राज्याचीस एकूण ५ हजार १३० केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी १ लाख ८० मनुष्यबळ लागणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदात यात २ हजार १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतुक करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रवासावर जीपीएस ट्रॅकरद्वारे नजर राहणार असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देतानाचे व त्या स्विकारून कपाटामध्ये ठेवतानाचे चित्रण मोबाईलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बैठी पथके व २७१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार संवेदनशिल केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गैरप्रकार उघडकीय येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द करून संबंधीतांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे. सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी ११ नंतर आणि दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी ३ नंतर विद्यार्थ्याला कोणत्याही परीस्थीतीमध्ये परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार सर्व सवलती दिल्या जाणार असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.

गैरप्रकार घडलेल्या ७०१ केंद्रांवर संपूर्ण स्टाफ नवीन

कोरोना काळातील २०२१ व २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्षात म्हणजे २०१८, २०१९, २०२०, २०२३ आणि २०२४ या परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आलेल्या ७०१ केंद्रामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना बदलून त्या केंद्रांवर संपूर्ण नीव स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागात १३९ केंद्रावर नवीन स्टाफ असेल. याशिवाय नागपूर विभागात ८६, छत्रपती संभाजीनगर १५५, मुंबई १८, कोल्हापूर ५३, अमरावती ९८, नाशिक ९३, लातूर ५९ अशा केंद्रावर नवीन स्टाफची नेमणुक असेल. कोकण विभागात गेल्या पाच वर्षात एकाही केंद्रावर गैरप्रकार घडलेला नाही, त्यामुळे त्या विभागातील एकाही केंद्रावरील स्टाफ बदलण्यात येणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.

विभागनिहाय विद्यार्थी संख्या

पुणे – २७५००४

नागपूर – १५१५०९

छत्रपती संभाजीनगर – १८९३१७

मुंबई – ३६०३१७

कोल्हापूर – १३२६७२

अमरावती - १६३७१४

नाशिक – २०२६१३

लातूर – १०९००४

कोकण – १७३९८

एकूण – १६११६१०

१५ मे पर्यंत निकाल

शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १५ मे पर्यंत लावण्यात येणार आहे, अशीही माहिती शरद गोसावी यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSocialसामाजिक