शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 5:10 PM

प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो.

ठळक मुद्देधनगर समाजाला भारिप महासंघाचा पाठिंबा धनगर व ओबीसी समाजासह दुखावलेल्या सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुका लढविण्याचे संकेत राज्यात तिस-या आघाडीच्या मोट बांधणीला सुरूवात

पुणे : कायद्यासमोर सर्व समान असून माजी मंत्री छगन भुजबळ यांची चौकशीची प्रक्रिया संपलेली आहे. त्यामुळे कायद्यानुसार भुजबळ यांना जामीन मिळाला पाहिजे.परंतु,काही कारणास्तव जामीन देता येत नसेल तर तत्काळ न्यायालयात खटला सुरू करून संबंधित व्यक्ती दोषी किंवा निर्दोष आहे,याबाबत निर्णय देणे अपेक्षित आहे. दोषी असल्यास तुरूंगात ठेवले तर त्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. त्यामुळे कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार भुजबळ यांना जामीन मिळायला हवा,अशी भूमिका भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी स्पष्ट केली.धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.या प्रसंगी धनगर समाजाचे नेते माजी आमदार विजय मोरे,हरीभाऊ बधे, अर्जुन सलगर,इंद्रकुमार भिसे,अशोक माने, मारूती जामकर आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, न्याय मिळण्यापासून वंचित ठेवलेल्या समाज अस्वस्थ आहे. त्यात छगन भुजबळ यांना न्याय मिळायला हवा,यासाठी माळी समाजाचे अनेक नेत्यांनी माझी भेट घेतली.कायद्याने भुजबळ यांना दिलेले स्वातंत्र्य नाकारता येत नाही.त्यातच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)वकिलांनी न्यायालयात आमची चौकशी संपली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ज्या कारणास्तव भुजबळांना यांना ताब्यात घेण्यात आले होते. ती प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायला हवा. चौकशीची प्रक्रिया संपल्यानंतर कोणलाही विनाकारण तुरूंगात ठेवता येत नाही. तसेच न्यायालयीन सुनावणी सुरू असताना प्रत्येकाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे.दरम्यान,धनगर समाजाला आरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारीप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १०० जागांवर धनगर समाजाचे प्रतिनिधी निवडणूक लढणार आहेत, असे धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच भारतीय जनता पक्ष,शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ खोटी आश्वासने दिली.त्यामुळे न्यायापासून वंचित ठेवलेल्या घटकांना बरोबर घेवून निवडणूक लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.------------------------------राज्यात तिस-या आघाडीच्या मोट बांधणीला सुरूवात राज्यातील सर्वच पक्षांनी धनगर व आदिवासी समाजात वाद निर्माण केला.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे धनगर समाजाची सत्ताधारी पक्षांच्या मागे फरफट झाली.त्यामुळे तिसरी आघाडी उभारून विधानसभा निवडणूक लढली जाणार आहे. येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरChagan Bhujbalछगन भुजबळNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी