शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

कुकडीच्या डाव्या कालव्याला धोका होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:20 PM

दुरूस्तीची मागणी : ठिकठिकाणी भगदाडे; २५ वर्षापासून प्रशासनाकडून दुर्लक्ष

राजुरी : येथील कुकडी डावा कालवा ठिकठिकाणी खराब झाला आहे. या कालव्याचे अस्तरीकरण निघाले असल्याने भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी दर्शवली आहे. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यात असलेल्या व कुकडी प्रकल्पातील व येडगाव धरणातून सुरू केलेला येडगाव धरण ते कर्जत करमाळा जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर असून या कालव्याच्या कामाला २५ वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहेत. या कालव्यातून मोठ्य प्रमाणात तेराशे क्युसेक्स सोडले जात असते. कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी निघालेले असून आतल्या बाजूस मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.साधारण या कालव्याची दुरुस्ती सन २००८ मध्ये करण्यात आली होती. परंतु तेव्हा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे कालव्याला प्लॅस्टर केलेले सिमेंट निघून गेले आहे. तसेच कालव्यामध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली असल्याने कालव्याच्या अस्तरीकरणाला भेगा पडलेल्या आहेत. गेल्याच वर्षी उन्हाळ््यात कालव्याला कर्जत करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तेव्हा ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाले होते. कालव्याचे प्लॅस्टर निघाल्याने येथील माती पाण्यात वाहून जात आहे. त्यामुळे येथे मोठे खड्डे पडू लागले आहेत. कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण न केल्यास या कालव्याला भविष्यात नक्कीच धोका उद्भवणार आहे. त्यामुळेच खड्डे भरून संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनीकेली आहे.हा कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला आहे त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. बोरी बुद्रुक या ठिकाणी तर या कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

टॅग्स :Puneपुणे