शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 14:14 IST

पुणे जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका; अतिरीक्त ऊसाचा प्रश्न भेडसावणार

प्रशांत ननवरे-बारामती : पुणे जिल्ह्यातील २०२०-२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना पूर्ण होत आहे.गतवर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले कोरोनाचे संकट अद्याप देखील घोंघावत आहे. कोरोना संकटातच यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखानदारीला यंदा अतिवृष्टीचा फटका  बसला आहे.अतिवृष्टीमुळे साखर कारखानदारी उशिरा सुरु झाली आहे.चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसपिकाची यंदा मुबलक उपलब्धता आहे.सर्वच कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत उरकण्याचे तसेच कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना जाऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.

ऊस हे नगदी पिक मानले जाते.जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे  आगार म्हणुन ओळखले जातात. या तालुक्यांमधुन शेतकरी सुरु,पुर्वहंगामी,आडसाली ऊसाचे उत्पादन घेतात.तर काही खोडव्याचे उत्पादन घेतात.यंदा ऊस गाळपात खासगी ,तर साखर उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र  आहे. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने आतापर्यंत तब्बल ३,९४,०३० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.५१% आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १,७७,०५० मे.टन ऊस गाळप करत सरासरी १०.१८% चा साखर उतारा राखत बाजी मारली आहे.

पुणे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे आतापर्यंतचे एकुण ऊस गाळप २४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे.तर साखर उत्पादन २० लाख ३४ हजार ७३५ टन झाले आहे.कारखानानिहाय ऊस गाळप आणि साखर उतारा पुढीलप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (१,७७,०५० मे.टन) (१०.१८%), माळेगाव सहकारी साखर कारखाना (१,७५,८००मे.टन) (१०.१०%), छत्रपती सहकारी साखर कारखाना (१,५१,१०० मे.टन ) (९.४६%), निरा भिमा सहकारी साखर कारखाना (१,७१६२२ मे.टन) (उपलब्ध नाही), घोडगंगा साखर कारखाना (१,३७,५१० मे.टन) (१०.६६%), संत तुकाराम साखर कारखाना (९७,६८० मे.टन) (९.२९%), भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (९४००० मे.टन) (९.६३%), बारामती अ?ॅग्रो (३,१०,८५० मे.टन) (८.५१%), दौंड शुगर (२,१२,३०० मे.टन) (९.०२%),  अनुराज शुगर्स लि. (१,२८३३० मे.टन) (९.५४%), श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (१,७७,८८१मे.टन) (९.१८%), विघ्नहर सहकारी साखर कारखाना (१,८९८७०मे.टन)(९.६०%), कर्मयोगी सहकारी साखर कारखाना २ लाख ५४०० मे.टन,(९.६०% )———————————————

 जिल्ह्यातील साखर कारखाने -१६ आतापर्यंत किती उसाचे गाळप (२४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे)—————————————अधिक गाळप करण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील असतात.त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर जावुन ऊसाची पळवापळवी होते.पुणे जिल्ह्यातुन अहमदनगर,सोलापुर,सातारा जिल्ह्यात ऊस गाळपासाठी जातो.—————————————

 ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया —

यंदा उसाचे मुबलक उत्पादन आहे .त्यामुळे उसाची तोड वेळेवर होत नाही .इंदापुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्याकडे जास्त उसाचा पुरवठा होत आहे .दराच्या तुलनेतही खाजगी कारखाने जादा दर देतात. मात्र ,खाजगी कारखाने क्रमवारीने तोड न करता पंसतीनुसार वशीलबाजीने तोडणी करतात .उसाला अतिवृष्टी नुकसानभरपाईही मिळाली नाही.

रणजित खारतोडे, कळस

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस