शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 14:14 IST

पुणे जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका; अतिरीक्त ऊसाचा प्रश्न भेडसावणार

प्रशांत ननवरे-बारामती : पुणे जिल्ह्यातील २०२०-२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना पूर्ण होत आहे.गतवर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले कोरोनाचे संकट अद्याप देखील घोंघावत आहे. कोरोना संकटातच यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखानदारीला यंदा अतिवृष्टीचा फटका  बसला आहे.अतिवृष्टीमुळे साखर कारखानदारी उशिरा सुरु झाली आहे.चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसपिकाची यंदा मुबलक उपलब्धता आहे.सर्वच कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत उरकण्याचे तसेच कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना जाऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.

ऊस हे नगदी पिक मानले जाते.जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे  आगार म्हणुन ओळखले जातात. या तालुक्यांमधुन शेतकरी सुरु,पुर्वहंगामी,आडसाली ऊसाचे उत्पादन घेतात.तर काही खोडव्याचे उत्पादन घेतात.यंदा ऊस गाळपात खासगी ,तर साखर उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र  आहे. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने आतापर्यंत तब्बल ३,९४,०३० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.५१% आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १,७७,०५० मे.टन ऊस गाळप करत सरासरी १०.१८% चा साखर उतारा राखत बाजी मारली आहे.

पुणे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे आतापर्यंतचे एकुण ऊस गाळप २४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे.तर साखर उत्पादन २० लाख ३४ हजार ७३५ टन झाले आहे.कारखानानिहाय ऊस गाळप आणि साखर उतारा पुढीलप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (१,७७,०५० मे.टन) (१०.१८%), माळेगाव सहकारी साखर कारखाना (१,७५,८००मे.टन) (१०.१०%), छत्रपती सहकारी साखर कारखाना (१,५१,१०० मे.टन ) (९.४६%), निरा भिमा सहकारी साखर कारखाना (१,७१६२२ मे.टन) (उपलब्ध नाही), घोडगंगा साखर कारखाना (१,३७,५१० मे.टन) (१०.६६%), संत तुकाराम साखर कारखाना (९७,६८० मे.टन) (९.२९%), भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (९४००० मे.टन) (९.६३%), बारामती अ?ॅग्रो (३,१०,८५० मे.टन) (८.५१%), दौंड शुगर (२,१२,३०० मे.टन) (९.०२%),  अनुराज शुगर्स लि. (१,२८३३० मे.टन) (९.५४%), श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (१,७७,८८१मे.टन) (९.१८%), विघ्नहर सहकारी साखर कारखाना (१,८९८७०मे.टन)(९.६०%), कर्मयोगी सहकारी साखर कारखाना २ लाख ५४०० मे.टन,(९.६०% )———————————————

 जिल्ह्यातील साखर कारखाने -१६ आतापर्यंत किती उसाचे गाळप (२४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे)—————————————अधिक गाळप करण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील असतात.त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर जावुन ऊसाची पळवापळवी होते.पुणे जिल्ह्यातुन अहमदनगर,सोलापुर,सातारा जिल्ह्यात ऊस गाळपासाठी जातो.—————————————

 ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया —

यंदा उसाचे मुबलक उत्पादन आहे .त्यामुळे उसाची तोड वेळेवर होत नाही .इंदापुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्याकडे जास्त उसाचा पुरवठा होत आहे .दराच्या तुलनेतही खाजगी कारखाने जादा दर देतात. मात्र ,खाजगी कारखाने क्रमवारीने तोड न करता पंसतीनुसार वशीलबाजीने तोडणी करतात .उसाला अतिवृष्टी नुकसानभरपाईही मिळाली नाही.

रणजित खारतोडे, कळस

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस