शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 2:47 PM

काळा पैसा बाहेरुन आणण्याच्या आश्वासनासह नोटाबंदीचे धोरण फसले. त्यानंतर आता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेसह देशातील बँकींग क्षेत्र सीबीआय, ईडी सारख्या संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत.

ठळक मुद्देमोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात वर्षभर मंदीचे वातावरण कायम सत्ता परिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणार नसल्याचा दावाट परदेशी गुंतवणुकीचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला

बारामती -  काळा पैसा बाहेरुन आणण्याच्या आश्वासनासह नोटाबंदीचे धोरण फसले. त्यानंतर आता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेसह देशातील बँकींग क्षेत्र सीबीआय, ईडी सारख्या संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली.

बारामती येथे दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने पाडव्यानिमित्त पवार हे व्यापाऱ्यांशी दरवर्षी संवाद साधून देशातील व्यापार, अर्थव्यवस्थेबाबत माहिती देताता.यंदा पवार यांनी  बाजारपेठेतील मंदीला केंद्र सरकारचे निर्णय कारणीभुत असल्याचे सांगत सत्ता परिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणार नसल्याचा दावा केला. यावेळी  पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बाहेर देशातील काळा पैसा आणून सामान्यांच्या खात्यावर भरण्याचे दाखविलेले स्वप्न दिवास्वप्न ठरले. त्यानंतर देशातील काळा पैसा  बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली.मात्र ,ते धोरण देखील फसले. सरकारने आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय शहाणपणाचे नाहीत. इतर कोणतेही निर्णय चुकले तर थोडा फार परिणाम होतो. मात्र अर्थकारणातील निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेसह व्यापार उद्योगांना भोगावे लागतात. 

केंद्रात एकाच पक्षाची बहुमताने एकहाती सत्ता असताना देशातली प्रशासन व्यवस्था आणि अर्थव्यवस्था योग्य मार्गाने चालणं आवश्यक आहे. मात्र सध्या तसं पाहायला मिळत नाही. रिझर्व्ह बँकेशी देशाच्या विकासाबाबत चर्चा करून काही धोरणं ठरवायची असतात. या संस्थेला आदेश देण्याची भुमिका कधीच स्वीकारली जात नाही. पुर्वी मोठा नावलौकीक असणाऱ्या रघुराम रजन यांना आरबीआय च्या गव्हर्नर पदाची सूत्र देण्यात आली. मात्र, राजन यांनी आरबीआयच्या स्वायत्ततेबाबत तडजोड होऊ न देण्याची भुमिका घेतल्याने त्यांची  सुट्टी झाली. त्यानंतर गुजरात येथील उर्जित पटेल यांची त्या  पदावर नियुक्ती झाली. मात्र, देशात प्रथमच आरबीआयकडुन 16 हजार कोटींची रक्कम देश चालविण्यासाठी मागण्यातआली. मात्र,आरबीआय प्रमुखांनी त्याला नकार दिला. याचा अर्थ राष्ट्रीय संस्था दुबळी करण्याचा हा प्रयत्न आहे. आरबीआय वर एकप्रकारे हल्ला करण्याचा हा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली.

पवार पुढे म्हणाले, मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना थेट परदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेला झेपणारं नसल्याची भूमिका घेत तो विषय प्रलंबित ठेवला. मात्र आताच्या सरकारने घेतलेला निर्णय सध्याच्या मंदीला कारणीभूत ठरला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. ज्या संस्थांची  आर्थिक ताकत मोठी आहे. जगातील अनेक  देशात त्यांचा व्यवहार आहे. त्यांच्या  दहा बाय दहाच्या जागेतील किराणा दुकानदाराशी  कशी स्पर्धा होणार, असा सवाल पवार यांनी व्यक्त केला आहे. आता रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करणे, सीबीआयमधील प्रमुखांबाबत धरसोडीचे निर्णय घेणे, ईडीच्या प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविणे, बँकेच्या प्रमुखांना अटक करण्यासारखे निर्णय चिंताजनक आहेत.

स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली असे कधी घडल नसल्याची चिंता पवार यांनी व्यक्त केली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांवर अटकेची झालेली कारवाईही चुकीची होती.  त्याचा परिणाम बँकांच्या अर्थपुरवठ्यावर झाला, दुष्काळामुळे दैनंदिन गरज असलेल्या धान्य आणि कडधान्यांच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे. उत्पादन घटल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. या सगळ्यांचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची चिन्हं आहेत.त्यामुळे येत्या काळात काटकसरीचं धोरण अवलंबून भरमसाठ खर्च टाळावा लागेल.अन्यथा व्यापाऱ्यांचं दिवाळं निघाल्याचं  दिसेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी सवंग लोकप्रियतेसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी अडचणीत आल्याचे नमुद केले. सर्वच घटकात नाराजी असुन अनेक व्यवसाय डबघाईला आल्याची चिंता व्यक्त केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी