शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार

By राजू इनामदार | Updated: April 18, 2024 17:38 IST

महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले....

पुणे : कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे. झारखंड, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे. तो थांबवायचा असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. हे काम करण्याची जबाबदारी तुमची-आमचीच आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी रास्तापेठेत जाहीर सभा झाली. त्यात पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, जयंत पाटील, अशोक पवार, रोहिणी खडसे, संग्राम थोपटे, संजय जगताप, सुषमा अंधारे, मदन बाफना, मोहोळ, सचिन अहिर, रोहित पवार असे तीनही प्रमुख घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व तीनही उमेदवार यावेळी उपस्थित होते.

त्यांना सत्तेबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही

पवार म्हणाले, ‘महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र त्यांनी ते दुर्लक्षित केले. सन २०१४ ला ते महागाई कमी करू असे म्हणत सत्तेवर आले. त्यानंतर १० वर्षे झाली. त्यावेळी ४१० रुपये असलेला गॅस सिलिंडर १ हजार १६० रुपये झाला. पेट्रोल ७१ रुपये लिटर होते ते १०६ रुपये झाले. आश्वासने द्यायची व ती विसरायची, त्यावर काहीच करायचे नाही, असे चालले आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ते केंद्र सरकार दाखवत आहे. अशा स्थितीत लोकशाही वाचवायची असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही.’

पराभवाच्या भीतीमुळे सत्ताधारी सैरभैर-

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘भाजपच्या जाहीरनाम्यात एकट्या मोदी यांचेच ४८ फोटो आहेत. पेट्रोल पंपावर त्यांचेच फोटो. इतकेच काय, कोरोनाच्या लस प्रमाणपत्रावरही त्यांचे फोटो होते. फोटो लावले नाहीत तर लोक आपल्याला विसरतील याची भीती त्यांना आहे. पराभव होणार याची खात्री पटल्यामुळेच ते काहीही करत आहेत.’ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांनीही यावेळी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनहिताचे कोणतेही काम करणे त्यांना १० वर्षांत शक्य झालेले नाही. लोकांनी आता त्यांना बरोबर ओळखले आहे, असे ते म्हणाले.

आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तसेच आम आदमी पार्टी व अन्य संस्था, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. थेट सभेच्या व्यासपीठाजवळ आणलेल्या गाडीतूनच शरद पवार यांचे आगमन झाले. घोषणा देत त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार