शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:05 IST

सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत असली तरी थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत

अजित घस्ते

पुणे: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.

मागील दोन वर्षे सातत्याने सुकामाव्याचे दर कमी होते; परंतु यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे; परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत.

बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात. त्यामुळे थंडीच्या काळात सुकामेव्याला मागणी वाढते, असे मार्केटयार्डातील ड्रायफुट्स व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

थंडीत सुकामेव्याला मागणी 

 दिवाळीत थंडीची चाहूल लागताच सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात.

या देशांतून आयात

- खारा पिस्ता - इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया- बदाम - कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया- पिस्ता - इराण, इराक- मॉमेरोन बदाम - इराण- अक्रोड - अमेरिका, चिली, भारताच्या काही भागांतून- अंजीर - इराण, अफगाणिस्तान- बेदाणा - अफगाणिस्तान, भारत

देशांतर्गत आवक

खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटककाजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळमनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर

महाग होण्याची कारणे

- वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट- आयात होत असलेला सुकामेवा महागच येत आहे.- भारतात सुकामेव्याची वाढती मागणी- अतिउष्णता आणि अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले- झाडांवरून माल कमी निघाल्याने कच्चा काजूचा तुटवडा

यंदा जगभरात सततच्या वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरा दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - शुभम गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

सुकामेव्याचे प्रतिकिलोचे भाव

वस्तूचे नाव                  नोव्हेंबर २०२४                              डिसेंबर २०२४

काजू                            ५५० ते ८५०                               ८०० ते १२००

अक्रोड बी                     ८०० ते १२००                             १००० ते १५००अक्रोड (अख्खा)             ४५० ते ६००                                ६०० ते ८००

बदाम                           ५०० ते ८००                                ५०० ते ८००अंजीर                          ७०० ते १०००                             १००० ते १५००

काळे मनुके                   ३०० ते ४००                               ५०० ते ६००बेदाणा (भारतीय)            २०० ते ३००                                २०० ते ३००

खारा पिस्ता                   ७०० ते १०००                             १००० ते १५००जर्दाळू                          २०० ते ४००                                ३०० ते ५००

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नTemperatureतापमानMarketबाजारHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसाFamilyपरिवार