शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द केल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. ...

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. इयत्ता दहावीच्या गुणांवर आयटीआय पॉलिटेक्निक आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जातो. परीक्षाच झाल्या नाहीत, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयामुळे निर्माण होणा-या समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असेही शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश पूर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागू शकते. मात्र, प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याऐवजी दहावीची लेखी परीक्षा घेणेच उचित ठरेल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

-------------------

राज्य शासनाने सध्या केवळ परीक्षा पुढे ढकल्या आहेत. त्या रद्द केल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु, सीबीएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे निश्चितच त्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश याबाबत अडचणी येऊ शकतात. या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना सामोरे जावे लागू शकते.

- एन. के. जरग, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

-----------------

राज्य शासन एसएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याबाबत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, सीबीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. कदाचित दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षांच्या पर्यायचा विचार करावा लागेल.

- गंगाधर म्हमाणे, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य