शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:14 AM

प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत.

पुणे  - प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत. तसेच बसेसला आगी लागण्याची ठोस कारणेही प्रशासनाला शोधता आलेली नाहीत. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासन बसला आग लागून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी व चालक-वाहकांनी उपस्थित केला आहे.मागील आठवड्यात संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर अचानक बसने पेट घेतला. या आगीमध्ये बस जळून खाक झाल्यानंतर पुन्हा बस पेटण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोथरूड बस आगारासमोर रस्त्यावरच बसने अचानक पेट घेतला होता. मागील अडीच वर्षांत १७ बस पेटल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही. या घटना घडल्यानंतर पीएमपी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला. पण अद्यापही शेकडो बसमध्ये ही यंत्रे अस्तित्वात नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने बसची पाहणी केली. या पाहणीमध्ये अग्निशमन यंत्रांसह प्रवाशांची गैरसोय होणाऱ्या इतर बाबींचीही पाहणी करण्यात आली.प्रशासनाची यंत्रे बसविण्याची सूचना : ‘पीएमपी’तील अधिकारी अनभिज्ञ‘पीएमपी’च्या मालकीच्या नेमक्या किती बसमध्ये अग्निशमन यंत्रे आहेत, याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, मालकीच्या सर्व सीएनजी बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली आहेत.डिझेल बसमध्ये ही यंत्रे नाहीत, तर बहुतेक सर्व बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. भाडेतत्त्वावरील बसमध्ये ही यंत्रे बसविण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पण आतापर्यंत किती बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.‘लोकमत टीम’ने एकूण १५ बसची पाहणी केली. यापैकी केवळ दोननवीन मिडी बसमध्ये अग्निशमन यंत्र आढळून आले.अन्य बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नव्हते. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीसह भाडेतत्त्वावरील बसचाही समावेश आहे.याबाबत एका चालकाने सांगितले, की बसमध्ये यंत्र बसविण्यात आले होते. पण त्याचा आतापर्यंत कधीच वापर झाला नाही.त्यामुळे ते एकदा काढल्यानंतर परत बसविले नाही. काही वेळा देखभाल-दुरुस्तीवेळी आगारामध्येच हे यंत्र काढून ठेवले जाते.‘सीआयआरटी’ करणार तपासणीबसला सातत्याने लागत असलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेला बसेसची तपासणी करण्याची विनंती केली आहे.संस्थेकडून पुढील काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर विविध कंपन्यांच्या मॉडेलनुसार प्रत्येकी एका बसचे आॅडिट केले जाणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या मॉडेलच्या बस आहेत. या प्रत्येक मॉडेलची एक बस तपासली जाणार आहे. त्यानुसार सीआयआरटीकडून अहवाल दिला जाईल.त्यामध्ये आग लागण्याची कारणे व त्यावर उपाययोजना सुचविल्या जातील. त्यानुसार बसमध्ये आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती ‘पीएमपी’चे मुख्य अभियंता-१ सुनील बुरसे यांनी दिली.मागील आठ वर्षांपासून बसने प्रवास करत आहे. पण क्वचित एखाद्या बसमध्ये अग्निशमन यंत्र दिसते. स्वयंचलित दरवाजे असलेल्या बसला आग लागल्यास यंत्रणेत बिघाड होऊन दरवाजे बंदच राहू शकतात. अशावेळी हे यंत्र बसमध्ये असणे आवश्यक आहे. इतर बसमध्येही ही यंत्रे गरजेची आहेतच.- विजय रणसुरे, प्रवासीपीएमपीकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडली जात आहे. सातत्याने आगीच्या घटना घडूनही दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे खिळखिळ््या बसने प्रवास करताना भीती वाटते. प्रशासन आगीमध्ये प्रवासी होरपळण्याची वाट पाहत आहे का?- शार्दुली कदम, प्रवासीचालकांना प्रशिक्षण पीएमपीकडून बहुतेक चालकांना अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण बसमध्ये यंत्रच उपलब्ध नसल्याने या प्रशिक्षणाचा उपयोगच होत नाही. संचेती पुलावर पेटलेल्या बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नसल्याने चालकाला त्याचा वापर करता आला नाही.

टॅग्स :Puneपुणे