शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:49 IST

"काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही."

Lok sabha Election : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोरही वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सवर्ण समाजातील गरिबांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, काँग्रेसने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही केला.

भाजपने सवर्ण गरिबांना आरक्षण दिले

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ब्राह्मण आणि बनिया समाजातदेखील अनेक गरीब आहेत. त्यांच्या मुलांना आरक्षण मिळू नये का? काँग्रेसने याकडे कधीच लक्ष दिले नाही. पण, आमच्या सरकारने गरीब सवर्ण कुटुंबातील मुलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला तर ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना द्यायचे आहे. कर्नाटकात काँग्रेसने हेच केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे आता संपूर्ण देशात लागू करायचे आहे. मात्र, आमच्या सरकारमध्ये असे कधीच होऊ शकत नाही. दलित आणि मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाही," अशी टीका मोदींनी केली.

ओबीसींचे हक्क हिसकावून घेण्याचे षड्यंत्रते पुढे म्हणतात, "ओबीसी आरक्षण कमी करण्याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमध्ये समोर आले आहे. तेथील सरकारने राज्यातील 77 मुस्लिम जातींना ओबीसी प्रमाणपत्र दिले. पण, दोनच दिवसांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केले. ओबीसींचे अधिकार लुटून संविधानाची चिरफाड करणे, हे इंडिया आघाडीचे काम आहे. संविधान आणि न्यायालयामुळे त्यांना तसे करता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आता व्होट बँक महत्त्वाची आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरलं"हिमाचल प्रदेश हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. हिमाचलच्या लोकांना मजबूत आणि शक्तिशाली सरकारचा अर्थ माहीत आहे. तुमच्यासाठी मी स्वतःचा जीव धोक्यात घालेन, पण तुम्हाला कधीही त्रास होऊ देणार नाहीत. तुम्ही काँग्रेसचा काळ पाहिला आहे. जेव्हा देशात कमकुवत सरकार होते, त्यावेळी पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचायचा. कमकुवत काँग्रेस सरकार जगभर विनवणी करत फिरायचे. भारत मातेचा अपमान मी सहन करू शकत नाही, पण काँग्रेस भारत मातेचा अपमान करणंही सोडत नाही. काँग्रेसला भारत माता की जय म्हणण्यात अडचण आहे. त्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे. पण आता भारत यापुढे जगाकडे भीक मागणार नाही, स्वतःची लढाई स्वबळावर लढेल आणि भारत त्यांना घरात घुसून मारेल," असंही मोदी यावेळी म्हणाले. 

हे देशाचे भविष्य...

"फक्त पूर्वजांच्या नावावर जगणारे हा देश घडवू शकत नाहीत. हा देश त्यांच्यामुळे विकसित होईल, ज्यांनी जमिनीवरुन उठून डोंगराएवढी उंची गाठली आहे. स्टार्टअप सुरू करणारे, आपला सॅटेलाईट अवकाशात पाठवणारे, शेतात ड्रोन उडवणाऱ्या मुली, फायटर प्लेन उडवणाऱ्या तरुणी भारताचे भविष्य आहेत. देशातील महिलांबद्दल काँग्रेसचे काय विचार आहेत, हे सर्व देशाने पाहिले आहे. मंडीचे नाव घेऊन काँग्रेसने कंगनाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या, त्या अतिशय खालच्या स्तराचा आहेत."

काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे...

"मी समान नागरी कायदा करण्याचे वचन दिले आहे. भारताचा नागरिक, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध असो, त्यांच्यासाठी समान नागरी कायदे असले पाहिजेत. मात्र काँग्रेस समान नागरी संहितेला विरोध करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली काँग्रेस शरियाचे समर्थन करते. तुम्ही अनेक दशकांपासून काँग्रेसची सत्ता पाहिली आहे. काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे नागरिक गरिबी, संकट आणि समस्यांनी वेढलेले असतात. म्हणूनच त्यांना देशातील जुनी परिस्थिती परत आणायची आहे. त्यांना देशाच्या विकासात रिव्हर्स गियर लावायचा आहे. काँग्रेस म्हणते की, आम्ही सत्तेत आलो तर 370 परत आणू, CAA रद्द करू, देशाची अण्वस्त्रे संपवू. पण हा मोदी असेपर्यंत काँग्रेसचे मनसूबे पूर्ण होऊ शकणार नाहीत," असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्या. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी