शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 2:48 PM

"काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही."

Lok sabha Election : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोरही वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सवर्ण समाजातील गरिबांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, काँग्रेसने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही केला.

भाजपने सवर्ण गरिबांना आरक्षण दिले

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ब्राह्मण आणि बनिया समाजातदेखील अनेक गरीब आहेत. त्यांच्या मुलांना आरक्षण मिळू नये का? काँग्रेसने याकडे कधीच लक्ष दिले नाही. पण, आमच्या सरकारने गरीब सवर्ण कुटुंबातील मुलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला तर ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना द्यायचे आहे. कर्नाटकात काँग्रेसने हेच केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे आता संपूर्ण देशात लागू करायचे आहे. मात्र, आमच्या सरकारमध्ये असे कधीच होऊ शकत नाही. दलित आणि मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाही," अशी टीका मोदींनी केली.

ओबीसींचे हक्क हिसकावून घेण्याचे षड्यंत्रते पुढे म्हणतात, "ओबीसी आरक्षण कमी करण्याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमध्ये समोर आले आहे. तेथील सरकारने राज्यातील 77 मुस्लिम जातींना ओबीसी प्रमाणपत्र दिले. पण, दोनच दिवसांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केले. ओबीसींचे अधिकार लुटून संविधानाची चिरफाड करणे, हे इंडिया आघाडीचे काम आहे. संविधान आणि न्यायालयामुळे त्यांना तसे करता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आता व्होट बँक महत्त्वाची आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरलं"हिमाचल प्रदेश हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. हिमाचलच्या लोकांना मजबूत आणि शक्तिशाली सरकारचा अर्थ माहीत आहे. तुमच्यासाठी मी स्वतःचा जीव धोक्यात घालेन, पण तुम्हाला कधीही त्रास होऊ देणार नाहीत. तुम्ही काँग्रेसचा काळ पाहिला आहे. जेव्हा देशात कमकुवत सरकार होते, त्यावेळी पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचायचा. कमकुवत काँग्रेस सरकार जगभर विनवणी करत फिरायचे. भारत मातेचा अपमान मी सहन करू शकत नाही, पण काँग्रेस भारत मातेचा अपमान करणंही सोडत नाही. काँग्रेसला भारत माता की जय म्हणण्यात अडचण आहे. त्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे. पण आता भारत यापुढे जगाकडे भीक मागणार नाही, स्वतःची लढाई स्वबळावर लढेल आणि भारत त्यांना घरात घुसून मारेल," असंही मोदी यावेळी म्हणाले. 

हे देशाचे भविष्य...

"फक्त पूर्वजांच्या नावावर जगणारे हा देश घडवू शकत नाहीत. हा देश त्यांच्यामुळे विकसित होईल, ज्यांनी जमिनीवरुन उठून डोंगराएवढी उंची गाठली आहे. स्टार्टअप सुरू करणारे, आपला सॅटेलाईट अवकाशात पाठवणारे, शेतात ड्रोन उडवणाऱ्या मुली, फायटर प्लेन उडवणाऱ्या तरुणी भारताचे भविष्य आहेत. देशातील महिलांबद्दल काँग्रेसचे काय विचार आहेत, हे सर्व देशाने पाहिले आहे. मंडीचे नाव घेऊन काँग्रेसने कंगनाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या, त्या अतिशय खालच्या स्तराचा आहेत."

काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे...

"मी समान नागरी कायदा करण्याचे वचन दिले आहे. भारताचा नागरिक, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध असो, त्यांच्यासाठी समान नागरी कायदे असले पाहिजेत. मात्र काँग्रेस समान नागरी संहितेला विरोध करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली काँग्रेस शरियाचे समर्थन करते. तुम्ही अनेक दशकांपासून काँग्रेसची सत्ता पाहिली आहे. काँग्रेसला असा भारत आवडतो, जिथे नागरिक गरिबी, संकट आणि समस्यांनी वेढलेले असतात. म्हणूनच त्यांना देशातील जुनी परिस्थिती परत आणायची आहे. त्यांना देशाच्या विकासात रिव्हर्स गियर लावायचा आहे. काँग्रेस म्हणते की, आम्ही सत्तेत आलो तर 370 परत आणू, CAA रद्द करू, देशाची अण्वस्त्रे संपवू. पण हा मोदी असेपर्यंत काँग्रेसचे मनसूबे पूर्ण होऊ शकणार नाहीत," असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्या. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी