शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होताना पूल, इमारती पडताहेत, त्याला जबाबदार काेण? : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:41 IST

ब्रिटिशांनी बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती, त्या प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाही

पुणे: ब्रिटिशांनी देशात बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. ते पूल १०० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झाल्यामुळे पाडण्यासाठी तेथून आमच्या पीडब्ल्यूडी विभागाला पत्रव्यवहार केला जातो. या प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाहीत. आपला देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना पूल, इमारती पडत आहेत. त्याला जबाबदार काेण ? पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा हुशार होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

प्रोफेशनल स्ट्रकचरल इंजिनिअरर्स असोसिएशनचे (पीएसईए) उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत होते. या पीएसईएचे अध्यक्ष शेषराव कदम, अजय कदम, अजय ताम्हाणकर, पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, शाश्वत विकास, आपत्तीरोधक आणि पर्यावरण सरंक्षक इमारती उभारण्यासाठी स्ट्रकचरल इंजिनिअरर्सने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. ब्रिटिशांनी बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. त्या प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाही. आपल्याकडील इमारती मजबूत झाल्या पाहिजेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले एखाद्या इमारतीला किती वर्षे झाले, तर ते सांगतात ४० वर्षे झाली आहेत. ती काढून पुनर्निर्माण केले पाहिजे. असे ते सहज बोलून जातात, असे सांगतात. त्याकाळी मजबूत बांधकाम होऊ शकले. आता का होत नाही. पुणे हे उद्योगाचे केंद्र असल्यामुळे जगातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. पीएसईए संघटनेच्या माध्यमातून प्रभावी योगदान देण्यासाठी आणि नवे पर्व ठरण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. संघटना स्थापना झाल्यावर १२० जणांनी सदस्य झाले आहेत. स्ट्रकचरल इंजिनिअरर्स पुढे अनेक आव्हाने आहेत. ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून होईल, असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस